ठाण्यात डम्परचा अपघात; पोलिसाचा मृत्यू

ठाणे : ठाणे येथील कॅडबरी चौकाच्या परिसरात एका डम्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. या घटनेमुळे ठाणे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी राबोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून डम्परचालकाला अटक केली आहे.


राजकुमार चौधरी असे अटक करण्यात आलेल्या डम्पर चालकाचे नाव आहे. सुरेश भालेराव असे अपघातात मृत पावलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते ठाण्यातील वर्तकनगर येथील शिवाईनगर भागात राहत होते. ते ठाणे पोलिस दलात पोलिस नाईक पदावर कार्यरत होते. त्यांची नेमणुक ठाणे पोलिस मुख्यालयात होती. सुरेश भालेराव हे शनिवारी सकाळी १०.३० वाजता कामावर जाण्यासाठी निघाले. दुचाकीने ते कामावर जात होते. कॅडबरी चौकातील ठाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या वाहिनीवरून त्यांची दुचाकी जात होती. त्याचवेळी एक भरधाव डम्पर आला आणि त्याने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात ते दुचाकीवरून खाली पडले आणि त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी डम्परचालक राजकुमार चौधरी याला अटक केली आहे.

Comments
Add Comment

अतिवृष्टी, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी आणखी एक संधी

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

अभिषेक शर्माने रचला इतिहास! ICC T20I फलंदाजी क्रमवारीत आजवरचे सर्वोच्च रेटिंग

नवी दिल्ली: भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)

IND vs WI: भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला धक्का!

अहमदाबाद: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला

नगरपरिषद, नगरपंचायतींच्या प्रारूप मतदार यादीची 8 ऑक्टोबरला प्रसिद्धी

मुंबई : राज्यातील 247 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची

एकाग्रता वाढवण्यासाठी फॉलो करा या टिप्स !

मुंबई : आजचा काळ म्हणजे वेगवान जीवनशैली आणि सततची स्पर्धा. या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकजण