बोरिवली ते गोराई जलप्रवास १५ मिनिटांत होणार

मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रो-रो जेट्टीचे झाले भूमिपूजन


मुंबई : बोरिवली येथील रो-रो जेट्टी फेज १ चे भूमिपूजन मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. या जेट्टीमुळे बोरिवली येथे येणाऱ्या पर्यटकांना तसेच स्थानिकांना जलमार्गाने सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. यापूर्वी या प्रवासाला एक तास तीस मिनिटे एवढा वेळ लागत होता. पण रो-रो जेट्टीमुळे हा प्रवास केवळ पंधरा मिनिटांत पूर्ण होणार असल्याची ग्वाही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिली. तसेच या जेट्टीचे काम वेळेत पूर्ण करून ही रो-रो सेवा नागरिकांच्या सेवेत लवकरच कार्यान्वित केली जाईल असेही यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले. यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार संजय उपाध्याय, भाजपा जिल्हाध्यक्ष बाळा तावडे यांसह स्थानिक नागरिक व कोळी बांधव उपस्थित होते.



बोरिवली येथील पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा तसेच स्थानिक प्रवासाला गती मिळावी यासाठी बोरिवली फेज १ रो-रो जेट्टी सेवेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. केंद्र सरकारच्या सागरमाला उपक्रमांतर्गत हा महत्वकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या जेट्टीचे भूमिपूजन शुक्रवार ११ जुलै २०२५ रोजी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले की, भाजपा सरकारच्या कार्यकाळात ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन होते, त्या कामांचे लोकार्पण देखील होते.

बोरीवली रो-रो प्रकल्पासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, ज्या प्रवासाला यापूर्वी एक तास तीस मिनिटे लागत होती तो प्रवास आता पंधरा मिनिटांत पूर्ण होणार आहे. जशी मुंबई मध्ये मेट्रो सेवा आहे, त्याचप्रमाणे मुंबईच्या MMR भागात वॉटर मेट्रो सेवा देखील सुरू व्हावी असा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. त्या दृष्टिकोनातून काम सुरु आहे, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५

Will the ITR filing 2025 date be extended? : ITR फायलिंगसाठी तांत्रिक अडचणी! आता फक्त इतके दिवस शिल्लक, ITR डेडलाईन वाढणार का? अपडेट जाणून घ्या

मुंबई : आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत आता अगदी जवळ आली आहे. करदात्यांसाठी १५ सप्टेंबर २०२५ ही शेवटची तारीख

भायखळा के पी रोडवर भीषण अपघात पार्सल चा ट्रक उलटला

मुंबई: मुंबईतील भायखळ्याच्या के. पी. रोडवर पार्सलचा ट्रक उलटून अपघात, वाहन चालकाला झोप लागल्यानं अपघात झाल्याची