भारतीय महिला संघाचा इंग्लंडमध्ये इतिहास: पहिल्यांदाच जिंकली टी-२० मालिका!


लंडन: भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडच्या भूमीवर एक नवा अध्याय लिहिला आहे. चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडला पराभूत करत, भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. भारतीय महिला क्रिकेटसाठी हा खरोखरच एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे.



भारताचा दणदणीत विजय, मालिकेत ३-१ ची आघाडी!


भारत आणि इंग्लंड महिला संघादरम्यान खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने धमाकेदार कामगिरी केली. इंग्लंडचा ६ विकेट्सने धुव्वा उडवत भारतीय संघाने मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेटपटूंनी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत, फलंदाज आणि गोलंदाज दोघांनीही विजयात मोलाची भूमिका बजावली.



मानधना, शेफालीचा जलवा; हरमनप्रीत-जेमिमाचा संयमी खेळ!


इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या १२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाने आक्रमक सुरुवात केली. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी सुरुवातीलाच तुफानी फटकेबाजी करत ७ षटकांत ५६ धावांची शानदार सलामी दिली आणि सामन्यावर आपली पकड मजबूत केली. स्मृतीने ३२ धावा केल्या तर शेफालीने ३१ धावांचे योगदान दिले. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज (नाबाद २४ धावा) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (२६ धावा) यांनी संयमी खेळ करत भारताचा विजय निश्चित केला.


भारतीय महिला संघाने हे आव्हान केवळ १७ षटकांतच पूर्ण करत इंग्लंडमध्ये ऐतिहासिक टी-२० मालिका नावावर केली.


Comments
Add Comment

ICC Womens Cricket World Cup 2025: आता वर्ल्डकपमध्ये आमनेसामने येणार भारत-पाकिस्तान

कोलंबो: क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आणि रोमांचक बातमी आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ (ICC Women's ODI World Cup 2025)

ICC Womens World Cup 2025: भारत-श्रीलंका सामन्याने होणार वर्ल्डकपची सुरूवात, ८ संघादरम्यान रंगणार महामुकाबला

मुंबई: आशिया कप २०२५ संपल्यानंतर आता महिला क्रिकेट महाकुंभाची सुरूवात होत आहे. आयसीसी महिला वनडे वर्ल्डकपची

क्रिस वोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

लंडन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू क्रिकेटपटू क्रिस वोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

आशिया चषक विजेत्या भारतीय संघाला BCCI कडून मिळणार मोठं बक्षीस

मुंबई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने आशिया चषक २०२५ ही टी २० क्रिकेट स्पर्धा जिंकली. भारताने सलग

पाकच्या अबरार अहमदला भारताच्या क्रिकेटर्सनी त्याच्याच भाषेत दिले उत्तर, व्हिडिओ व्हायरल

सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी केली पाकिस्तानी गोलंदाजाची नक्कल; व्हिडिओ व्हायरल दुबई: आशिया कप २०२५ च्या अंतिम

पाकिस्तानला हरवल्यानंतर BCCIकडून टीम इंडियावर पैशांचा पाऊस, मिळणार इतके मोठे बक्षीस

दुबई: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय