मीरा भाईंदर पोलिस आयुक्तांची तडकाफडकी बदली, मोर्चा प्रकरण भोवलं

  115

मिरा भाईंदर: मिरा भाईंदरमध्ये काल (८ जुलै) संपन्न झालेला  मराठी भाषिक मोर्चा होऊ न देण्यासाठी पोलिसांनी सर्वात आधी मोर्च्याला परवानगी नाकारून आणि त्यानंतर संबंधित नेत्यांची धरपकड केल्याप्रकरणावर एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. मराठी भाषा संवर्धन आणि अस्मितेच्या मुद्द्यावर शांततेत काढला जाणारा हा मोर्चा हा मीरा भाईंदर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे चांगलाच तापला. या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांची  गृह विभागाद्वारे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता निकेत कौशिक आयुक्तपदाची धुरा सांभाळतील.



नेमकं काय आहे प्रकरण? 


मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यावसायिकांनी मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून काल मराठी मोर्चा काढण्यात आला. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे मोर्चा सुरू होण्याआधीच मनसेच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ८ जुलैच्या मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले. यापूर्वीच त्यांना शहरात उपस्थित राहू नये, अशी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यांनी ती नाकारल्यामुळे ही कारवाई पोलिसांकडून करण्यात आली. मात्र त्यामुळे मनसैनिक आणखीनच आक्रमक झाले.


पोलिसांकडून करण्यात आलेल्या धरपकड कारवाईवर संताप व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सल्ला मसलत करत, शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक हे देखील मोर्चात सहभागी झाले. पण, पोलिसांच्या आक्रमक कारवाईमुळे तापलेल्या मोर्चेकरांचा रोष सरनाईकांवर आला. सरनाईक मोर्चाच्या ठिकाणी येताच त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. त्यांच्यावर पाण्याची बॉटल देखील भिरकवण्यात आली.


मोर्चाला परवानही नाकारून सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी काल दिले होते. चौकशीचे आदेश दिल्यानंतर २४ तासांतच पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

मुंबईत दीड लाख नागरिकांना दरवर्षी भटक्या श्वानांचा दंश

निर्बीजीकरण करून माेकाट कुत्र्यांना आश्रयस्थानात हलवण्याची मुंबईकरांची मागणी मुंबई : दिल्लीतील भटक्या

कोस्टल रोड आजपासून २४ तास वाहतुकीसाठी खुला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई अध

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस