मला विचारल्याशिवाय... मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नेत्यांना दिले हे स्पष्ट आदेश

  29

मुंबई: राज्यात सध्या मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहेत. त्यातच आज मीरारोड येथे मनसेकडून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावरून आज राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकारी तसेच नेत्यांना आदेश दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या पक्षातील पदाधिकारी तसेच नेत्यांना आदेश दिला आहे की त्यांना विचारल्याशिवाय अथवा त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही विधान सोशल मिडिया अथवा मीडियासमोर करू नये.

राज ठाकरेंनी सोशल मीडियावरून मनसे पदाधिकारी तसेच नेत्यांना हे आदेश दिले आहेत. पाहा काय म्हणालेत राज ठाकरे,

एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.

आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.

राज ठाकरे ।


५ जुलैला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेक वर्षानंतर एकाच मंचावर दिसले होते. यावेळेस मुद्दा होता तो मराठीचा. मराठीच्या मुद्द्यावरून हे दोन्ही भाऊ अनेक वर्षांनी एकाच मंचावर दिसले होते.
Comments
Add Comment

"बेघर होऊ देणार नाही! : "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ज्येष्ठ कलाकार मनमोहन महिमकर यांना ग्वाही

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार मनमोहन महिमकर यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले

Pratap Sarnaik: "मी मंत्री, आमदार नंतर... मराठी आधी!" प्रताप सरनाईक यांची ठाम भूमिका

मीरा-भाईंदर: मराठी एकीकरण समितीच्या वतीने मिरा रोड येथे आज मराठी अस्मिता, स्थानिक भाषिकांचे अधिकार आणि न्याय

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि ठाकरेंचे राजकारण!

मुंबई : तब्बल २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. त्यांच्या 'आवाज मराठीचा' मेळाव्याने

Mangalprabhat Lodha : आदित्य ठाकरेंकडून रोहिंग्या-बांग्लादेशींच्या झोपड्यांना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न का? मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा रोखठोक सवाल

कुर्ला आयटीआय परिसरात पारंपरिक खेळाचे मैदान उभे राहणार : मंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई : कुर्ल्यातील महाराणा

Devendra Fadanvis : सरन्यायाधीश भूषण गवईंचा हा सत्कार फक्त विधीमंडळाकडून नव्हे तर १३ कोटी जनतेकडून – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : आज महाराष्ट्र विधीमंडळात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी

महिला मतदारांनी लेखी निवेदन दिल्यास 'दारूबंदी'

खारघर परिसरातील दारूबंदीचे निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करणार - उपमुख्यमंत्री