मला विचारल्याशिवाय... मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नेत्यांना दिले हे स्पष्ट आदेश

मुंबई: राज्यात सध्या मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहेत. त्यातच आज मीरारोड येथे मनसेकडून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावरून आज राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकारी तसेच नेत्यांना आदेश दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या पक्षातील पदाधिकारी तसेच नेत्यांना आदेश दिला आहे की त्यांना विचारल्याशिवाय अथवा त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही विधान सोशल मिडिया अथवा मीडियासमोर करू नये.

राज ठाकरेंनी सोशल मीडियावरून मनसे पदाधिकारी तसेच नेत्यांना हे आदेश दिले आहेत. पाहा काय म्हणालेत राज ठाकरे,

एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.

आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.

राज ठाकरे ।


५ जुलैला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेक वर्षानंतर एकाच मंचावर दिसले होते. यावेळेस मुद्दा होता तो मराठीचा. मराठीच्या मुद्द्यावरून हे दोन्ही भाऊ अनेक वर्षांनी एकाच मंचावर दिसले होते.
Comments
Add Comment

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

Ashish Shelar : "विठ्ठलाला घेरणाऱ्या बडव्यांशी आता गळ्यात गळे का?"; आशिष शेलारांचा राज-उद्धव युतीवर जहरी प्रहार!

शेलारांचा 'लाव रे तो व्हिडिओ' स्टाईलने पलटवार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणसंग्रामासाठी राजकीय