Bharat Bandh News : उद्या भारत बंदची मोठी घोषणा, शाळा, बँका... काय काय बंद राहणार?

  246

२५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार


नवी दिल्ली : बँका, विमा, टपाल, कोळसा खाणी, महामार्ग आणि बांधकाम क्षेत्रातील अंदाजे २५ कोटी कामगार आणि कर्मचारी बुधवारी (९ जुलै ) देशभरात संपावर जाणार आहेत. देशातील १० प्रमुख कामगार संघटनांनी या भारत बंदची घोषणा केली आहे. या संपामुळे अनेक महत्वाच्या सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.


देशातील १० प्रमुख कामगार संघटनांनी या भारत बंदची घोषणा केली आहे. त्याचसोबत या संघटनांच्या संबंधित इतर कामगार संघटनांही त्यामध्ये भाग घेणार असल्याची माहिती आहे. केंद्र सरकारने कामगार विरोधी, शेतकरी विरोधी धोरण अवलंबल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. सरकारच्या या धोरणांचा फायदा केवळ उद्योगपतींना, त्यांच्या उद्योगांना होणार असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या नेत्या अमरजीत कौर यांनी सांगितले की, देशभरातून सुमारे २५ कोटी कामगार या आंदोलनात सहभागी होणार असून, शेतकरी आणि ग्रामीण कामगारही धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवतील.



भारत बंदमध्ये काय बंद असणार ?


बँकिंग सेवा

विमा कंपन्यांचे काम

पोस्ट ऑफिस

कोळसा खाणींचे काम

राज्य वाहतूक सेवा (सरकारी बसेस)

महामार्ग आणि रस्ते बांधकाम

सरकारी कारखाने आणि कंपन्यांचे उत्पादन.




काय सुरू राहणार?



  • बहुतेक खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे काम सुरू असेल.

  • रुग्णालये, वैद्यकीय आपत्कालीन सेवा सामान्य राहण्याची अपेक्षा आहे.

  • खाजगी शाळा/महाविद्यालये आणि ऑनलाइन सेवा.

  • बुधवारी, ९ जुलै रोजी होणाऱ्या बंदमध्ये देशातील शहरी भागांसह ग्रामीण भागांतील कामगारही सहभागी होणार असल्याचं कामगार संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. देशव्यापी संपादरम्यान अनेक अत्यावश्यक सेवा बंद राहू शकतात. त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांवरती होण्याची शक्यता आहे.


बंद का पुकारण्यात आला?


कामगार संघटनांनी केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया याच्याकडे १७ प्रमुख मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली होती. पण केंद्र सरकारकडून त्याला कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही. त्याचमुळे ९ जुलै रोजी भारत बंदची हाक देण्यात आल्याचं कामगार संघटनांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणारी वार्षिक कामगार परिषद गेल्या १० वर्षांपासून घेण्यात आली नाही. त्याचवेळी सरकारने चार कामगार कायदे अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे भविष्यात कामगार संघटना खिळखिळ्या करण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत आहे.



कामगार संघटनांच्या प्रमुख मागण्या



  • चारही लेबर कोड त्वरित रद्द करावेत

  • सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खाजगीकरण थांबवावे

  • किमान वेतन दर महिना ₹२६,००० निश्चित करावा

  • जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा लागू करावी

  • शहर आणि ग्रामीण भागात रोजगार हमी योजनांचा विस्तार करावा

Comments
Add Comment

बिजू जनता दलाचे (बीजेडी) प्रमुख आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक पुन्हा रुग्णालयात दाखल

मुंबई: बिजू जनता दलाचे (बीजेडी) प्रमुख आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना वयोमानाशी संबंधित

उपराष्ट्रपतीपदासाठी NDA कडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे नाव जाहीर

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची आज नवी दिल्ली येथे महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत

Vice Presidential Election: उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या उमेदवाराची आज होणार घोषणा

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती पदासाठी आज एनडीएच्या उमेदवाराची दिल्लीत घोषणा होण्याची शक्यता आहे. संसदेचं पावसाळी

...नाही तर राहुल गांधींनी माफी मागावी !

नवी दिल्ली : मतचोरीचे आरोप करणाऱ्या पण हे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे देणे टाळणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल

मुख्य निवडणूक आयुक्त संतापले, मतचोरीवर बेधडक बोलले

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन बेलगाम आरोप करणाऱ्या राहुल गांधी आणि त्यांच्या

भारताच्या स्टार खेळाडूच्या घरी चोरी, अनेक मानाचे पदक आणि पुरस्कारही पळवले

पश्चिम बंगाल: भारताची प्रसिद्ध जलतरणपटू आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या बुला चौधरी यांच्या घरी चोरी झाली