OYO Hotels मध्ये एका तासासाठी खोली भाड्याने का दिली जाते?

  75

मुंबई: OYO हॉटेल्सच्या वाढत्या चैनीचा मुद्दा उपस्थित करत सरकारने याकडे लक्ष द्यावं, असं भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पावसाळी अधिवेशनात म्हंटले आहे.  या हॉटेल्ससाठी ग्रामपंचायत, नगर परिषद,महानगरपालिकेची परवानगी घेतली जात नाही,  या हॉटेल्समध्ये नेमकं काय चालतं? हा अभ्यासाचा विषय आहे, असं ते पुढे म्हणाले.


महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आयो हॉटेल्सचा मुद्दा उपस्थित केला. मुनगंटीवार म्हणाले की, एकीकडे महाराष्ट्रात अनेक गोष्टी सुरु असताना ओ-वाय-ओ नावाच्या हॉटेल्सची चैन तयार झाली आहे. शहराच्या २०-२० किलोमीटर दूर, निर्जन ठिकाणी हे OYO हॉटेल आहेत. मनात शंका आली की हे हॉटेल्स नेमके काय आहेत? तर ही अतिशय गंभीर बाब असल्याचं लक्षात आलेलं आहे.


मुनगंटीवार पुढे म्हणाले, सरकारने या हॉटेल्सकडे लक्ष द्यावं. या हॉटेलमध्ये एक तासासाठी खोली भाड्याने दिली जाते. ही कशासाठी दिली जाते, हा एक पोलिस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे.



संस्कृतीचा ऱ्हास होत असेल तर सरकारने अभ्यास करावा


''ओ-वाय-ओ' च्या माध्यमातून वीस-वीस किलोमीटर कुणीही प्रवाशी जाऊन राहात नाही. एखादा प्रवासी तिथे गेला तर त्याचं अर्थशास्त्र कच्चं आहे, असं समजावं. कारण जाण्या-येण्याच्या टॅक्सीला खूप खर्च येतो. त्या पैशात शहरात चांगली रुम मिळेल.'' असं म्हणत मुनगंटीवार पुढे बोलले की, खरंतर संस्कृती रक्षकांचं सरकार आहे. इथे जर संस्कृतीचा ऱ्हास होत असेल तर सरकारने अभ्यास करावा. गृह राज्यमंत्र्यांनी याची माहिती घ्यावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

Comments
Add Comment

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य: मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई: मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये

राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती गुन्हेगारीवर लगाम; सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्रातील विविध महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत असून मेट्रो, विमानतळ, रेल्वे,

प्रवेश प्रक्रियेमध्ये दुहेरी लाभ घेणाऱ्या आयटीआय विद्यार्थ्यांवर कडक कारवाई: मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश

मुंबई: आयटीआय प्रवेश प्रक्रियेमध्ये दुहेरी लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे

धक्कादायक! २५८ खाजगी रुग्णालयांचे परवाने रद्द!

मुंबई : खाजगी आरोग्य क्षेत्रातील गैरव्यवहारांवर निर्णायक कारवाई करत, महाराष्ट्र सरकारने बॉम्बे नर्सिंग होम्स

मराठा तरुणांना आदिवासी प्रमाणपत्र वाटप! विभाग उपायुक्तावर निलंबनाची कारवाई

बोगस प्रमाणपत्रांसंदर्भात आदिवासी विकास भवनात उपायुक्तांवर थेट निलंबनाची कारवाई मुंबई: पावसाळी अधिवेशनात

Devendra Fadanvis : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 'हरित वीज क्रांती': मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, १० हजार कोटींची बचत होणार!

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना एक