ठाकरेंसोबत युती केल्यानं काँग्रेसचं मोठं नुकसान! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका

नागपूर : उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यानंतर विधानसभेत काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आज (सोमवार, ७ जुलै) रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.


काँग्रेसची स्थिती फार वाईट


मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला नेहमीच अपमानित केले आहे. त्यामुळे अजून किती अपमानित व्हायचे ते काँग्रेस पक्षाने ठरवायचे आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतू, उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यानंतर विधानसभेत काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. उद्धवजींनी जिद्द करून काँग्रेसच्या जागा घेतल्या आणि काँग्रेसला कमी केले. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंचा नाकर्तेपणा काँग्रेसच्या अंगावर आला. ठाकरे सरकारची अँटी इनकंबन्सी काँग्रेसवर आली. त्यावेळी काँग्रेसचे नेते हतबल होते. त्यामुळे आता काँग्रेसची स्थिती फार वाईट आहे," असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Raghav Chadha : ‘आप’ने आत्मचिंतन करण्याची गरज - राघव चड्ढा यांचा टोला

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) सध्या अंतर्गत नाराजी आणि वादांच्या भोवऱ्यात अडकला असून, पक्षाने आत्मचिंतन

Chitra Wagh : 'कितीही विरोध झाला तरी भाजपा महिलांना आरक्षण मिळवून देणारच'

मुंबई : महिला आरक्षणाला विरोध करून लाखो महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणाऱ्या विरोधी पक्षांना या लाखो

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ९३ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागांपैकी १५२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल २०२६ रोजी

Nitesh Rane : 'मराठीचा आग्रह धरताना हिंदूंमध्ये फूट पाडू नका'

सिंधुदुर्ग : 'प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आमच्या परिवहन मंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेला