"मी मराठी बोलणार नाही..." व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले, मुख्यमंत्र्यांनी फटकारले

मुंबई: पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला असला तरी मराठीच्या मुद्द्यावरुन चाललेले राजकारण आताही सुरूच आहे . अशातच शेअर बाजारातील व्यावसायिक सुशील केडिया यांनी शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टॅग करीत,  थेट आव्हान देणारे ट्विट केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. यातच उबाठा  आणि मनसेने आज मुंबईत आयोजित केलेल्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. त्यामुळे माय मराठीवरून राज्यात पुन्हा एकदा रणकंदन सुरू आहे.



काय आहे नेमके प्रकरण?


मुंबईजवळील मीरा-भाईंदर शहरात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी मारवाडी जैन समाजातील एका दुकानदाराला मराठी न बोलल्याबद्दल मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला असला तरी. परंतु हे प्रकरण गंभीर होत चालले आहे आणि आता ते एक मोठे राजकीय प्रकरण बनले आहे. दरम्यान, प्रसिद्ध गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी मराठीत न बोलण्याची शपथ घेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, "मी मराठी बोलणार नाही आणि मराठी शिकणार नाही." त्यांच्या या ट्विटमुळे राजकारण आणखीन तापण्याची शक्यता आहे. ज्याचा मुद्दा आजच्या उबाठा आणि मनसे प्रमुखांच्या मेळाव्यात उपस्थित केलं जाऊ शकतो.



देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


ठाकरे बंधुच्या  विजयी मेळाव्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, त्यांनी जरूर मेळावा घ्यावा, आम्ही घेतलेल्या निर्णयांचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतोय. पण हिंदी सक्तीसाठी समिती करणारे, त्या समितीत आपल्या उपनेत्याला टाकणारे, पहिलीपासून बारावीपर्यंत हिंदी सक्तीचा करा ही त्या समितीची शिफारस स्वीकारणारे आता मेळावा घेणार आहेत. कोण दुटप्पी आहे हे मराठी माणसाला लक्षात येते", अशी टीका फडणवीस यांनी केली.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी केडिया यांनाही फटकारले. मी मराठी शिकणार नाही हे अत्यंत उद्दामपणे सांगणे चुकीचे नाही का? असा सवाल त्यांनी केला.

Comments
Add Comment

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Raghav Chadha : ‘आप’ने आत्मचिंतन करण्याची गरज - राघव चड्ढा यांचा टोला

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) सध्या अंतर्गत नाराजी आणि वादांच्या भोवऱ्यात अडकला असून, पक्षाने आत्मचिंतन

Chitra Wagh : 'कितीही विरोध झाला तरी भाजपा महिलांना आरक्षण मिळवून देणारच'

मुंबई : महिला आरक्षणाला विरोध करून लाखो महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणाऱ्या विरोधी पक्षांना या लाखो

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ९३ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागांपैकी १५२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल २०२६ रोजी

Nitesh Rane : 'मराठीचा आग्रह धरताना हिंदूंमध्ये फूट पाडू नका'

सिंधुदुर्ग : 'प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आमच्या परिवहन मंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेला