मुंबईत आता दर १०० मीटर अंतरावर बसवल्या जाणार कचरापेट्या

मुंबई : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांसाठी कचरा उचलण्यासाठी मोठ्या आणि छोट्या कॉम्पॅक्टरसह मनुष्यबळाची सेवा खासगी संस्थेमार्फत घेतली जाणार आहे. या कंत्राट कामांमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रती १०० मीटर अंतरावर छोट्या आकाराच्या कचरा पेट्या बसवल्या जाणार आहेत. आजवर अशाप्रकारच्या लटकत्या कचरापेट्या बसवल्या गेल्या असल्या तरी त्याची योग्यप्रकारे स्वच्छता आणि देखभाल तसेच त्यातील कचरा उचलला न गेल्याने या कचरा पेट्या अस्वच्छ दिसून येत होत्या; परंतु आता नव्याने आकर्षक स्वरुपात तब्बल २३ हजार कचरापेट्या बसवल्या जाणार असून त्यांची दैनंदिन स्वच्छता आणि देखभालही संबंधित संस्थेकडून केली जाणार आहे.


पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने सध्या कचरा उचलण्यासाठी खासगी संस्थेकडून पुरवल्या जाणाऱ्या कॉम्पॅक्टर सेवेचे कंत्राट संपुष्टात येत असल्याने आता नव्याने २१ विभागांमध्ये मनुष्यबळासह कचरा गाड्या पुरवण्यासाठी कंत्राट कामांसाठी निविदा निमंत्रित केली आहे. या नव्याने कंत्राट कामांमध्ये ७ टनाच्या कॉम्पॅक्टर असतील आणि यामध्ये निव्वळ कचरा असेल तसेच सुका कचरा आणि घातक कचऱ्यासाठी स्वतंत्र वाहने असतील. मात्र, या कंत्राट कामांमध्ये रस्त्याच्या कडेला १०० मीटर अंतरावर थुंकण्यासाठी तसेच किरकोळ कचरा टाकण्यासाठी आकर्षक कचरापेट्या बसवल्या जाणार आहेत.

Comments
Add Comment

IMD: महाराष्ट्रासाठी 'चक्रीवादळ शक्ती'चा इशारा; ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

पुणे/मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) अरबी समुद्रात विकसित होत असलेल्या 'चक्रीवादळ शक्ती' च्या पार्श्वभूमीवर

दिवाळीसाठी गावाला जाताय, रेल्वे सोडतेय ३० विशेष गाड्या

दिवाळीनिमित्त अतिरिक्त विशेष गाड्या धावणार मुंबई (प्रतिनिधी) : येत्या दिवाळी उत्सवानिमित्त प्रवाशांच्या

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची