Ajit Pawar: माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं!

पुणे: प्रतिष्ठेची निवडणूक बनलेल्या माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पारडं जड ठरलं होतं, त्यानंतर आता त्यांची कारखान्याच्या चेअरमनपदावरही निवड केली गेली आहे. यामुळे आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे साखर कारखान्याचे चेअरमनही झाले आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवडीला विरोधी गटाने आक्षेप घेतला होता. ब वर्गामधून निवडून आलेल्या व्यक्तीस चेअरमन होता येत नाही, असं विरोधकांचं म्हणणं होतं. मात्र त्यावर निवडणूक अधिकाऱ्याने वेळ संपल्याचं कारण देत अजित पवारांची चेअरमन पदावरील निवड कायम ठेवली. याचबरोबर व्हाईस चेअरमनपदावर संगिता कोकरे यांनी निवड झाली आहे.


दरम्यान या निवडी वरती विरोधी गटातील संचालक चंद्रराव तावरे यांनी आक्षेप घेतला. तावरे यांनी संभाजीनगर खंडपीठाच्या निर्णयाची प्रत देत अजित पवार हे ब वर्गातून निवडून आल्यामुळे त्यांची चेअरमन पदी निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप केला तर रंजन तावरे यांनी माळेगाव कारखान्यासाठी अजित पवार यांनी एकदाही ऊस गाळपासाठी घातला नाही असा आरोप केला.

Comments
Add Comment

एसबीआयकडून मोठ्या प्रमाणावर भरती: ३,५०० अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती

मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (SBI) आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि

स्वदेशी बनावटीचे सर्वेक्षण जहाज ‘इक्षक’ ६ नोव्हेंबरला नौदलात होणार सामील

नवी दिल्ली : स्वदेशी बनावटीचे सर्वेक्षण जहाज 'इक्षक' ६ नोव्हेंबर रोजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी

भारत-ऑस्ट्रेलिया महिला वर्ल्डकप उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल? वाचा नियम

मुंबई : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, क्रिकेट चाहत्यांना उपांत्य फेरीतील रोमांचक

भारताला मोठा धक्का! प्रतीका रावल दुखापतीमुळे विश्वचषक उपांत्य फेरीतून बाहेर

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर प्रतीका रावल हिला झालेल्या दुखापतीमुळे ती

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिका, भारत-आफ्रिका आमनेसामने; दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

मुंबई : ऑस्ट्रेलिया मालिकेचं आव्हान संपण्याआधीच टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी करत

'ह्युमन कोकेन' हिंदी सायकॉलॉजिकल थ्रिलर लवकरच होणार रिलीज ! पुष्कर जोगचा नवा प्रयोग

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीत क्वचित पाहिलेलं, वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषा मिटवणारं जग आता पडद्यावर येणार