डोळ्यांसमोर पाणी असूनही घागर रिकामीच

विजेच्या अघोषित भारनियमनाने बदलापूरकर हैराण


बदलापूर : बदलापूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. चौथी मुंबई म्हणून बदलापूरकडे पाहिले जात असले तरी, शहराला पाणी आणि वीजपुरवठ्याच्या समस्यांसह इतर ही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. डोळ्यांसमोर पाणी असूनही घागर रिकामीच असते, हे वास्तव आहे. पाणी आणि वीज यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर भव्य हंडा कळशी आणि जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.


बदलापूर पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा ते जीवन प्राधिकरणाच्या बेलवली येथील कार्यालयापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला. बदलापुरात मागील अनेक दिवसांपासून नियमितपणे पाण्याची टंचाई जाणवते. शहराची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.


त्यामुळे, लोकांना अनेकवेळा पाण्यावाचून त्रास सहन करावा लागतो. अनियमित आणि कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा,ठिकठिकाणी होणारा गढूळ पाणी पुरवठा याचा निषेध करण्यासाठी भव्य हंडा - कळशी तर कोणतीही पूर्व सूचना न देता वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, काही ठिकाणी डीम लाईट असणे, वीज अधिकारी फोन न उचलणे,सतत फोन बिझी असणे आणि कधी फोन उचलला तर उडवाउडवीची उत्तरे देणे याचा निषेध करण्यासाठी भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी श्रीधर पाटील, तुकाराम म्हात्रे, अविनाश मोरे, बाळाराम कांबरी, चेतन धुळे, मनोहर आंबवणे, तसेच महिला आणि पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांकडून पत्रकारांना शिष्टमंडळाच्या सोबत जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला.



आश्वासने पूर्ण नाही केली तर गावाला पाठवू - वामन म्हात्रे


शिवसेना बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शुक्रवार पर्यंत वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. एका महिन्याच्या आत एक कोटीचा निधी मंजूर करून जनरेटर देणार असून आश्वासन पूर्ण केले नाही तर सबंधित अधिकाऱ्याला घरी पाठवू इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

Job News : नोकरी शोधताय तर ही आहे तुमच्यासाठी बातमी

एसटीच्या रत्नागिरी विभागात ४३४ पदांची भरती रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) रत्नागिरी विभागामध्ये

विरोध डावलून सात वर्षांपूर्वीच बांधलेला उड्डाणपूल पाडण्यास बीएमसीची मंजूरी

मुंबई: बीएमसीने गोरेगावमधील वीर सावरकर (एमटीएनएल) उड्डाणपूल पाडण्यासाठी तत्त्वतः परवानगी दिली आहे. सात

खूशखबर! मुंबईतील तलावांमध्ये ९८ टक्के जलसाठा

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या तलावांमधील पाणी पातळी ९८

एलफिस्टन ब्रिज भागातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये होणार

मुंबई : येथील शिवडी-वरळी उन्नत मार्गामधील एलफिस्टन ब्रिज परिसरातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन

Wrestler : भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियावर कोसळला दुखा:चा डोंगर

सोनीपत: भारताचा ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला

राज्याच्या आर्थिक प्रगतीत उद्योग क्षेत्राचा वाटा मोठा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योग क्षेत्राच्या व