Chandrashekhar Bawankule : भूमी गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन! महसूल मंत्री बावनकुळेंची विधानसभेत घोषणा

आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत


मुंबई : नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या सिटी सर्व्हे क्रमांक १४४ भूखंडाच्या फसवणुकीप्रकरणी उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर येत्या एका महिन्यात विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.



बिनशेती परवानगी न घेता शासनाची फसवणूक


आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभागृहात सांगितले की, संगमेश्वर येथील सिटी सर्व्हे क्रमांक १४४ या भूखंडाची बिनशेती (एनए) परवानगी न घेता, शासकीय मोजणी न करता, नजराणा न भरता आणि तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करत १६ तुकडे करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हे भूखंड खरेदीखतात 'बैल गोठ्यांसाठी' खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, या प्रकरणात कायद्याचे उल्लंघन झाले आहे, हे खरे आहे. एकूण २५८ दस्तऐवज (डीड) नोंदवण्यात आले आहेत. मुद्रांक अधिकारी घुरके, गावित, गुप्ते, हिरे, कळसकर यांनी अनधिकृत दस्त नोंदणी केल्याने त्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.




आठ मुद्रांक अधिकाऱ्यांच्या चुका


२०१३ सालापासून आठ मुद्रांक अधिकाऱ्यांनी चुका केल्याचे त्यांनी नमूद केले. कोणते दस्त चुकीचे नोंदवले आहेत, याची येत्या सात दिवसांत प्राथमिक चौकशी करून अधिवेशनाच्या अखेरपर्यंत सभागृहात माहिती दिली जाईल, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. तसेच, या प्रकरणात मालेगाव (नाशिक) येथील मुद्रांक अधिकारी (स्टॅम्प व्हेंडर) झाकीर आणि आरीफ अब्दुल लतीफ तसेच त्यांचे साथीदार अपव्यवहारात दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Blue Flag Beach : श्रीवर्धन समुद्रकिनारा ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित होणार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा शाश्वत विकास साधत त्याला ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित

Maharashtra : गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार

मुंबई : "गोदा ते नर्मदा" या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून

Maharashtra : उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार

मुंबई : राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार येत उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक

Heat Wave : उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज

मुंबई  : वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये

Reservation : अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी

Nitesh Rane : मत्स्य शेतकऱ्यांच्या उत्पादनांसाठी राज्यात 'क्लस्टर', मूल्यवर्धनासाठी कारखाना उभारण्यावरही चर्चा

मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक उद्योगाची जोड देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे