दोन कोटींच्या अमली पदार्थांच्या म्होरक्याला हैदराबाद विमानतळावर अटक

कल्याण : मानपाडा पोलीसांनी डाउन टाउन, खोणी पलावा परिसरात सुमारे दोन कोटी करोड रूपयांचे १.९३ किलो मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ मिळुन आलेल्या दाखल गुन्हयातील मुख्य फरार आरोपी बाहेरील देशात पळुन जात असताना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैद्राबाद येथुन अटक करण्यात आली.


मानपाडा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हयात आरोपी असिल जाबर सुर्वे आणि मोहम्मद इसा मोहम्मद हनीस कुरेशी व मेहेर फातिमा रिजवान देवजानी या महिलेसह तीन आरोपींना यापुर्वी अटक करण्यात आली होती. या गुन्हयातील मुख्य आरापी मोहम्मद रहिम सलीम शेख उर्फ फरहान हा गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार होता. २९ जून रोजी या गुन्हयातील मुख्य आरापी मोहम्मद रहिम सलीम शेख उर्फ फरान हा बाहेरील देशात पळून जात असताना त्याला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैद्राबाद येथे ताब्यात घेवून अटक करण्यात आली. मोहम्मद शेख हा वेगवेगळ्या देशात जात असल्याची माहिती मिळत असून त्याच्या विरूध्द मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. ही कामगिरी पोलीस उप आयुक्त अतुल, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे, पोलीस निरीक्षक राम चोपडे, सपोनि कलगोंडा पाटील, संपत फडोळ यांच्या पथकाने केली आहे.

Comments
Add Comment

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

प्राइम व्हिडिओने ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३ चा दमदार ट्रेलर रिलीज; जुन्या मैत्री आणि नव्या सत्तेमधील संघर्ष उलगडणार

मुंबई : ‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३  चे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. या

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे