Maharashtra Assembly 2025: "तळीये गावातील सर्व दरडग्रस्त कुटुंबियांचे पुर्नवसन करावे"

  41

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी


मुंबई: महाड तालुक्यातील तळीये येथील दरड पडून झालेल्या दुर्घटनेला ४  वर्षे होत आले तरी अद्याप पूर्णपणे दरडग्रस्त कुटुंबियांचे पुर्नवसन करण्यात आले नाही, ही बाब विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Opposition Leader Ambadas Danve) यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. तसेच या पावसाळ्यात अशी दुर्घटना होऊ नये, यासाठी लवकरात लवकर या कुटुंबियांचे पुर्नवसन करण्याची मागणी दानवे यांनी केली.

राज्यात मागील काही काळात पुणे जिल्ह्यातील माळीण गाव,रायगड जिल्ह्यातील महाडच्या तळीये व कर्जत तालुक्यातील एका वाडीवर दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अनेक गावकरी मृत्यूमुखी पडल्यानंतरही सरकारने याबाबत गंभीर दखल घेत नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.

दरडग्रस्त तळीये गावात दरड कोसळून ६६ लोकांचा मृत्यू झाला असल्याने या गावाचे पुनर्वसन करण्याचे शासनाने ठरवले होते. आतापर्यंत फक्त ६६ कुटुंबांना घरे मिळाली असून बाकीचे कुटुंब अजूनही असुरक्षित ठिकाणी राहत आहेत. सदर ठिकाणी अजूनही पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे येथे नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची मागणीही दानवे यांनी केली.

या पावसाळ्यात या दरडग्रस्त भागात अशाच काही घटना घडण्याची शक्यता दानवे यांनी व्यक्त करत आज म.वि.प. नियम २८९ अन्वये या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी विधान परिषद सभागृहात सूचना केली.
Comments
Add Comment

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य: मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई: मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये

राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती गुन्हेगारीवर लगाम; सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्रातील विविध महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत असून मेट्रो, विमानतळ, रेल्वे,

प्रवेश प्रक्रियेमध्ये दुहेरी लाभ घेणाऱ्या आयटीआय विद्यार्थ्यांवर कडक कारवाई: मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश

मुंबई: आयटीआय प्रवेश प्रक्रियेमध्ये दुहेरी लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे

धक्कादायक! २५८ खाजगी रुग्णालयांचे परवाने रद्द!

मुंबई : खाजगी आरोग्य क्षेत्रातील गैरव्यवहारांवर निर्णायक कारवाई करत, महाराष्ट्र सरकारने बॉम्बे नर्सिंग होम्स

मराठा तरुणांना आदिवासी प्रमाणपत्र वाटप! विभाग उपायुक्तावर निलंबनाची कारवाई

बोगस प्रमाणपत्रांसंदर्भात आदिवासी विकास भवनात उपायुक्तांवर थेट निलंबनाची कारवाई मुंबई: पावसाळी अधिवेशनात

Devendra Fadanvis : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 'हरित वीज क्रांती': मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, १० हजार कोटींची बचत होणार!

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना एक