
अडीच वर्षात शिवसेना संपवली
ज्या मराठी माणसाने शिवसेनेला ताकद दिली त्याच मराठी माणसाची उद्धव ठाकरेंनी वाट लावली. ४० वर्षांत बाळासाहेबांनी शिवसेना उभारली. पण तीच शिवसेना अडीच वर्षात संपवली अस राणे म्हणाले. मुंबईत फक्त १८ टक्के मराठी उरलेत. १९६० साली ते ६० टक्के इतके होते. मराठी माणसाला मुंबई बाहेर काढण्याला कोण जबाबदार असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना फक्त दोनच दिवस मंत्रालयात आले. आजच त्यांना मराठी कसे आठवले? मराठी तरुणांसाठी रोजगार मिळावा यासाठी त्यांनी काय केलं? मराठीचा एवढा पुळका आला असेल तर स्वतःच्या मुलाला इंग्रजी शाळेत का टाकलं? शरद पवार, सोनिया गांधींसोबत गेल्यानंतर त्यांना मराठी आठवली नाही का?” जीआर कधी खोटं बोलेल का? कर्तृत्वशून्य व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे, खोटं बोल पण रेटून बोल म्हणजे म्हणजे उद्धव ठाकरे असा जोरदार हल्ला त्यांनी उद्धव ठाकरेंवर चढवला.
राज ठाकरेंना शिवसेनेत छळले
राज ठाकरे पक्षात शिवसेनेत असताना उद्धव ठाकरेंनी त्यांना खूप छळलं होते, शिवसेना सोडण्याची त्यांची इच्छा नव्हती मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रवृत्त केलं, कुटुंब म्हणून किती जणांना उद्धव ठाकरेंनी जवळ केलं हे सांगावे? ज्या मराठी माणसाने शिवसेनेला ताकद दिली त्याच मराठी माणसाची वाट उद्धव ठाकरेंनी लावली. 40 वर्षांत बाळासाहेबांनी शिवसेना उभारली. पण तीच शिवसेना अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी संपवली असा आरोप नारायण राणे यांनी केला.
कोण भरत गोगावले?
मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या आरोपांबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर कोण भरत गोगावले मी ओळखत नाही असे सणसणीत उत्तर राणे यांनी यावेळी दिले.