नगरपालिका शाळेच्या मुख्याध्यापकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, कारण...

संपूर्ण शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ


कोल्हापूर: राज्यात गेल्या काही दिवसांत शिक्षकांच्या आत्महत्येच्या घटना वाढत असल्याचं चित्र आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कागल नगरपालिकेच्या शाळेत कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक मारुती व्हरकट यांनी विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तातडीने शोधकार्य सुरू केलं. अग्निशमन विभागाच्या मदतीने आज सकाळी मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी यावेळी घटनास्थळी जमली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

मारुती व्हरकट हे कागल नगरपालिकेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या का केली, यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांच्या अचानक घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे नातेवाईक, सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येमागील कारण स्पष्ट होण्यासाठी पोलीस विविध अंगाने तपास करत आहेत.
Comments
Add Comment

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी

Nashik : नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी नाशिक जिल्ह्यात १० हजार पक्षी थांबे

Nashik : राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गटांच्या शेतावर जैविक व नैसर्गिक पद्धतीने

Prakash Abitkar : मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानातून मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाचे होणार निदान मुंबई : राज्यातील

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचे काम याच वर्षी सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड