इंडोनेशियात ६५ जणांना घेऊन निघालेली फेरीबोट उलटली

बाली : पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण असलेल्या इंडोनेशियात बालीजवळ ६५ जणांना घेऊन निघालेली फेरीबोट उलटली. या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण बेपत्ता आहेत. इतरांना वाचवण्यात आले आहे. बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री ११.२० वाजता बाली सामुद्रधुनी परिसरात दुर्दैवी घटना घडली. जावा येथून एका पर्यटनस्थळाच्या दिशेने निघालेली फेरीबोट उलटली.

फेरीबोटीत ५३ प्रवासी आणि १२ क्रू सदस्य होते. जावाच्या केतापांग बंदरावरून निघाल्यानंतर बालीच्या गिलिमानुक बंदराजवळ म्हणजे सुमारे ५० किमी. अंतर पार केल्यावर फेरीबोट उलटली. प्रवासाला सुरुवात केल्यानंतर जेमतेम अर्ध्या तासात दुर्दैवी घटना घडली. एकूण नऊ छोट्या बोटींमधून बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

आशिया खंडाच्या आग्नेय भागात इंडोनेशिया हा देश आहे. इंडोनेशिया हा १७ हजार लहान - मोठ्या बेटांचा समूह आहे. एका बेटावरुन दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी इंडोनेशियात फेरीबोटींचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. सुरक्षा मानकांचे पालन न केल्यामुळे इंडोनेशियात अनेक बोटींचे अपघात झाले आहेत. मार्च २०२५ मध्ये बालीच्या किनाऱ्याजवळ उसळलेल्या लाटांमुळे एक बोट उलटली होती. या दुर्दैवी घटनेत एका ऑस्ट्रेलियन महिलेचा मृत्यू झाला होता.
Comments
Add Comment

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१

बांगलादेशात रक्तरंजित राजकीय संघर्ष

आणखी एका हसीनाविरोधी नेत्याला घरात घुसून घातल्या गोळ्या बांग्लादेश : बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आणखी एका

बांगलादेशमध्ये उस्मान हादी पाठोपाठ मोहम्मद मोतालेब शिकदारची हत्या

ढाका : बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी

दक्षिण आफ्रिकेत गोळीबारात १० जण ठार

जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियामध्ये बाँडी बीचवर बेछूट गोळीबार करण्याची घटना ताजी असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतील

बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने