
मुंबई : शासकीय कार्यालयात आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणे, केक कापणे, सेल्फी, फोटोसेशन करणे महागात पडणार आहे.याबाबत आता राज्य शासनाने कडक भूमिका घेत 'महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९'च्या अनुषंगाने परिपत्रक जारी केले आहे. कार्यालयीन वेळेत, कार्यालयीन जागेवर वैयक्तिक समारंभ घेणे, हा शिस्तभंग मानला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य शासनाने जारी केलेल्या नियमानुसार, कोणताही सरकारी कर्मचारी कार्यालयीन वेळ आणि ठिकाणी अशासकीय, वैयक्तिक, धार्मिक वा सामाजिक कार्यक्रम आयोजित करू शकत नाही. नियम क्रमांक ४, ५ व २२ अंतर्गत कर्मचाऱ्यांकडून शिस्तबद्ध, पारदर्शक आणि लोकाभिमुख वर्तणूक अपेक्षित आहे.परिपत्रकानुसार या नियमांचे उल्लघंन केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांची प्रशासकीय चौकशी होऊ शकते. त्यानंतर समज देणे, लेखी तडकाफडकी तक्रार, पदोन्नती थांबवणे, निलंबन किंवा सेवासमाप्ती यांसारखी शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. शासनाने संबंधित विभागप्रमुखांना याबाबत कठोर सूचना दिल्या आहेत.

विधान परिषदेत शिवसेना आमदाराने उठवला मुद्दा, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आश्वासन मुंबई : महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी पंढरपूरची पावन वारी ...
कार्यालयीन वेळेत 'सेलिब्रेशन'चा बेत आखला जातो. कामाच्या वेळेतच मोठ्या उत्साहात केक कापला जातो. कर्मचारी तासाभरासाठी काम बाजूला ठेवतात. काही ठिकाणी संगीत आणि मोबाइल व्हिडीओ शूटिंगही सुरू असते.यामुळे दैनिक भेटींसाठी आलेल्या नागरिकांच्या कामांना संबंधित कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वाढदिवस सेलिब्रेशन खोळंबा ठरत आहे. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण होत आहे. शासनाने ठरवून दिलेली कार्यालयीन वेळ ही लोकसेवेसाठी आहे, वैयक्तिक सोहळ्यांसाठी नाही, याचे भान संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी ठेवण्याची गरज आहे.त्यामुळे राज्य शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.