
नारायण राणे यांचे धक्कादायक विधान
मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरेंना भाऊबंदकीच्या नात्याने परत येण्याचे आवाहन करत आहेत, परंतु त्यांनीच राज ठाकरेंना छळले होते.
राणे म्हणाले, "मला आठवते, याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची याना जाणिव नाही वाटतं."
राणे यांनी आरोप केला आहे की, "राज जी, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले, याने सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसविले. गेलेले परत मिळविण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरेमध्ये नाही."जो बूँद से गई वो हौद से नही आती" असा टोला ही खासदार नारायण राणे यांनी लगावला आहे.
काय म्हणाले खासदार नारायण राणे
उद्धव ठाकरे सन्माननीय राज जी ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करत आहेत. मला आठवते, याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची याना जाणिव नाही वाटतं आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत.
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 1, 2025
सन्माननीय राज जी, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले, याने सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसविले. गेलेले परत मिळविण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरेमध्ये नाही. जो बूँद से गई वो हौद से नही आती। - खासदार नारायण राणे (माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री)