Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला जूनमध्ये भरपूर पावसाची अपेक्षा होती. परंतु वरुणदेवाने मोठी निराशा केली आहे. विदर्भातील अकरा जिल्ह्यांपैकी केवळ सहा जिल्ह्यांत सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे, तर नागपूरसह पाच जिल्हे गंभीर पावसाच्या तुटवड्याच्या रेड झोनमध्ये सापडले आहेत.


चंद्रपूरचे हवामान अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांच्या आकडेवारीनुसार, १ ते ३० जून या कालावधीत विदर्भातील पावसाची स्थिती फारशी आनंददायक नव्हती. सर्वात चांगली कामगिरी बुलडाणा जिल्ह्याची राहिली, जिथे सरासरीपेक्षा ३३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांनी मुश्किलीने सरासरी गाठली.



सर्वात गंभीर परिस्थिती नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती आणि वर्धा या पाच जिल्ह्यांची आहे. नागपूरमध्ये सरासरीपेक्षा ४४ टक्के कमी पाऊस पडला, तर भंडारामध्ये ४० टक्के कमी पावसाची नोंद झाली. गोंदिया, अमरावती आणि वर्धा अनुक्रमे ३१, ३३ आणि २१ टक्के कमी पावसाने तहानलेले आहेत.


नागपूरच्या संदर्भात विशेष बाब म्हणजे गेल्या पाच वर्षांमध्ये दुस-यांदा जून महिन्यात इतका कमी पाऊस पडला आहे. गतवर्षी संपूर्ण जूनमध्ये केवळ ७९.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती, जी अत्यंत निराशाजनक होती.


पुरेशा पावसाच्या अभावामुळे अनेक जिल्ह्यांमधील पेरण्या अजूनही रखडल्या आहेत. वेळेवर पेरणी न झाल्यामुळे शेतक-यांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पेरण्यांना उशीर झाल्यास त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे शेतक-यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.


भारतीय हवामान विभागाने जुलै महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाचा संचित तूट लवकरच भरून निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. विदर्भातील शेतकरी आणि सामान्य जनता या सकारात्मक अंदाजावर विसंबून राहिली आहे.



जूनमधील सामान्य पावसाची माहिती


प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भात जून महिन्यात साधारणपणे १९० मिलिमीटर सरासरी पाऊस बरसतो आणि आठ ते नऊ दिवस पावसाळी असतात. परंतु यावेळी कमी दिवस पाऊस पडल्यामुळे अनेक जिल्हे पावसाच्या तहानेने व्याकुळ झाले आहेत. नागपूरमध्ये तर फक्त तीन ते चार दिवसच पावसाळी दिवस होते. उल्लेखनीय म्हणजे १८६१ मध्ये जूनमध्ये विक्रमी ५०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.



जिल्हानिहाय पावसाची आकडेवारी


जून २०२५ मध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसाची नोंद अशी आहे...


नागपूर - ९०.६ मिलिमीटर, भंडारा - ७९.९ मिलिमीटर, गोंदिया - ८४.७ मिलिमीटर, अमरावती - १०२.३ मिलिमीटर, वर्धा - १२२.७ मिलिमीटर, चंद्रपूर - १३०.९ मिलिमीटर, अकोला - १५१.१ मिलिमीटर, बुलडाणा - १५७.१ मिलिमीटर, यवतमाळ - १६६.९ मिलिमीटर, गडचिरोली - १७६.० मिलिमीटर आणि वाशीम - २०५.७ मिलिमीटर.


या आकडेवारीवरून स्पष्ट होते की विदर्भातील पावसाची स्थिती खरोखरच चिंताजनक आहे आणि जुलैमध्ये चांगल्या पावसाची नितांत गरज आहे.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह