मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

  21

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव


मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे की लवकरच त्यांना मरीन ड्राईव्हपेक्षाही दुप्पट मोठा समुद्री पदपथ मिळणार आहे. सध्या नेताजी सुभाष मार्गावरील मरीन ड्राईव्हची लांबी साडेतीन किलोमीटर आहे, परंतु नवीन सागरी किनारा मार्गावर जो पदपथ तयार होत आहे तो पूर्ण ७.५ किलोमीटर लांब आहे.


या विशाल समुद्री पदपथाची रुंदी २० मीटर ठेवण्यात आली असून प्रियदर्शनी पार्कपासून वरळीपर्यंत हा विस्तार आहे. पदपथाच्या सुशोभिकरणासाठी देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून नागरिकांच्या सुविधेसाठी बसण्याच्या कट्ट्यांचीही व्यवस्था केली जाणार आहे.



मुंबई महानगरपालिकेने श्यामलदास गांधी उड्डाणपूलपासून राजीव गांधी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत १०.५८ किलोमीटर लांबीचा सागरी किनारा रस्ता पूर्ण केला आहे. या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव देण्यात आले आहे.


पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या समुद्री पदपथाचे दोन मुख्य भाग जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू होणार आहेत. प्रियदर्शनी पार्कपासून हाजी अली आणि बडोदा पॅलेसपासून वरळीपर्यंतचे हे दोन्ही भाग नागरिकांसाठी खुले होणार आहेत. एकूण पदपथाच्या ७० ते ८० टक्के भाग लवकरच वापरासाठी तयार होणार आहे.


हाजी अली येथे भूमिगत मार्गाची खास सुविधा करण्यात आली असून पादचारी आसानीने मुख्य रस्त्यावर येऊ शकतील. मरीन ड्राईव्हप्रमाणेच या नवीन पदपथावरही बसण्यासाठी दगडांची सलग व्यवस्था केली जाणार आहे.


समुद्राच्या भरतीच्या लाटांपासून संरक्षणासाठी या पदपथाला लागून मजबूत सागरी भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीसाठी नवी मुंबईतील उलवे खाणीतील आर्मर रॉक या नैसर्गिक दगडांचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक दगडाचे वजन एक ते तीन टन असून हे दगड प्रचंड वेगाने आदळणाऱ्या लाटांना तोंड देऊ शकतात.


मरीन ड्राईव्हवरील सिमेंट काँक्रीटच्या टेट्रापॉडच्या तुलनेत हे नैसर्गिक दगड पर्यावरणपूरक आहेत. टेट्रापॉडमध्ये सागरी जीवसृष्टी विकसित होत नाही, परंतु आर्मर रॉक नैसर्गिक असल्यामुळे समुद्री जीवजंतू आणि प्रवाळ यांच्या विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण होते.


सागरी किनारा मार्ग आधीपासूनच वाहनांसाठी पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे आणि आता या मार्गाच्या बरोबरीने समांतर चालणारा हा समुद्री पदपथ मुंबईकरांच्या मनोरंजनासाठी आणि आरोग्यासाठी एक नवीन गंतव्यस्थान ठरणार आहे.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

माजी मंत्री थोरात हे समाजकारणातील हिरो : सयाजी शिंदे

संगमनेर : चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेमुळे निळवंडे येथे धरणाची जागा निश्चित झाली. धरण व कालव्यासाठी