
महाराष्ट्राची राजधानी असूनही मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी १८ पर्यंत खाली घसरली आहे. याला जबाबदार कोण ? असाही प्रश्न खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. मागील दोन दशकांपेक्ष जास्त काळापासून मुंबई महापालिकेत ठाकरेंची सत्ता आहे. पण याच काळात मुंबईतून मराठी माणूस हळू हळू हद्दपार होऊ लागला. उद्धव ठाकरेंना मराठी माणसांविषयी प्रेम आहे असे ते म्हणतात. पण उद्धव ठाकरेंची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत का शिकली ? असा प्रश्न खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.
सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असेच म्हणावे लागेल, या शब्दात खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 30, 2025