जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या पारदर्शकतेसाठी मेरी पंचायत अ‍ॅप

एका क्लिकवर ग्रामस्थांच्या कारभाराची माहिती


अलिबाग : केंद्र व राज्य सरकारने ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर दिल्याने आता ग्रामपंचायतीच्या विकासासाठीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळेच ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता असावी व या सर्व कारभाराची माहिती ग्रामस्थांना एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी पंचायतराज मंत्रालयाने तंत्रज्ञानाचे एक पाऊल पुढे टाकत 'मेरी पंचायत' हे अ‍ॅप आणले आहे. या अ‍ॅपमुळे गावच्या कारभाराची सर्व माहिती प्रत्येक ग्रामस्थाला सहज पाहता येणार आहे.



डिजिटल युगात आता स्थानिक स्वराज्य संस्थाही मागे नाहीत, हे 'मेरी पंचायत' अ‍ॅपने दाखवून दिले आहे. ग्रामपंचायतींचा विकास झपाट्याने होऊ लागलेला असून, केंद्र व राज्य सरकारकडून आता पंचायतींना थेट निधी मिळू लागला आहे. या निधीमुळे ग्रामीण प्रशासन गावातील कामे सहजरित्या किती निधी उपलब्ध झाला आहे, गावामध्ये सध्या कोणकोणती कामे सुरू आहेत, कोपणकोणत्या योजना सुरू आहेत, याची सर्व माहिती अ‍ॅपद्वारे प्रत्येकाला मिळू शकेल, ग्रामस्थांना ही माहिती मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये हेलपाटे घालावे लागणार नाहीत.


केवळ माहितीच नाही, तर अ‍ॅपच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामपंचायतीचा सामाजिक व आर्थिक लेखाजोखा देखील तपासून पाहता येणे शक्य होणार आहे.



ग्रामपंचायतीमधील संख्या, समित्यांची सदस्य माहिती, समित्यांचे अध्यक्ष, नोटीस बोर्ड, ग्रामपंचायतीला मिळणारे अनुदान याबरोबरच ग्रामपंचायतीची एकूण बँक खाती किती आहेत, त्यामध्ये शिल्लक रक्कम व प्रत्येक कामासाठी खर्च झालेली रक्कम याशिवाय कामाची सद्यस्थिती, वेगवेगळी देयके, पाण्याचे स्रोत, नळजोडणी, पाणीतपासणी अशी सविस्तर माहिती प्रत्येक ग्रामस्थाला अ‍ॅपवर पाहता येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराची सर्व कुंडलीच ग्रामस्थांपुढे उघड होणार आहे. गावांच्या विकासाभर भर देण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबवण्यात येत असून, मेरी पंचायत'मुळे कारभार अधिकाधिक पारदर्शक होणार आहे.

Comments
Add Comment

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला माणगाव तालुक्यात ७ मार्चपासून सुरुवात

माणगाव : माणगाव तालुक्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांना विविध प्रकारचे शासकीय दाखले व महसूल विषयक

अलिबाग नगरपालिकेचा १६१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

करवाढ नाही, विकासकामांना प्राधान्य : नगराध्यक्षा अक्षया नाईक अलिबाग : अलिबाग नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सन

जिल्हा परिषदेत सत्तासमीकरणाची जुळवाजुळ

जिल्हाधिकारी कार्यालयात १२ मार्चला अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रिया तालुकास्तरावर ११ मार्चला सभापती,

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना