कोकणात पक्षाची ताकद वाढवणारे रविंद्र चव्हाण होणार महाराष्ट्र भाजपाध्यक्ष

मुंबई : राज्यात महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. भाजपाकडून निवडणूक अधिकारी म्हणून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी नेमणूक झाली आहे. सोमवारी ३० जून २०२५ रोजी महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष पदासाठी रविंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच राज्यातील भाजपाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रविंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला. अद्याप महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष पदासाठी रविंद्र चव्हाण यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज आलेला नाही. यामुळे रविंद्र चव्हाण यांची निवड ही निव्वळ औपचारिकता असल्याची चर्चा आहे.

रविंद्र चव्हाण यांनी भाजपाचे युवा कार्यकर्ता ते मंत्री असा प्रवास केला आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल. कोकणात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष पदाची जबाबदारी आली तर कोकणात पक्षाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

रविंद्र चव्हाणांनी भरला उमेदवारी अर्ज

‘"राष्ट्र प्रथम्, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः" हा भाजपा परिवाराचा मूलमंत्र अनुसरून, अंत्योदयाच्या मार्गावर आजवर वाटचाल करत आलो. या वाटचालीत पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोलाची साथ आणि जनतेचे आशीर्वाद लाभले. या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या पाठबळावर आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज केंद्रीय मंत्री किरेनजी रिजिजू यांच्याकडे सुपूर्द केला. यापुढच्या वाटचालीत देखील तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मोलाचे ठरणार आहेत,’ असे रविंद्र चव्हाण म्हणाले.



Comments
Add Comment

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा