कोकणात पक्षाची ताकद वाढवणारे रविंद्र चव्हाण होणार महाराष्ट्र भाजपाध्यक्ष

  76

मुंबई : राज्यात महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. भाजपाकडून निवडणूक अधिकारी म्हणून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी नेमणूक झाली आहे. सोमवारी ३० जून २०२५ रोजी महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष पदासाठी रविंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच राज्यातील भाजपाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रविंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला. अद्याप महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष पदासाठी रविंद्र चव्हाण यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज आलेला नाही. यामुळे रविंद्र चव्हाण यांची निवड ही निव्वळ औपचारिकता असल्याची चर्चा आहे.

रविंद्र चव्हाण यांनी भाजपाचे युवा कार्यकर्ता ते मंत्री असा प्रवास केला आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल. कोकणात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष पदाची जबाबदारी आली तर कोकणात पक्षाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

रविंद्र चव्हाणांनी भरला उमेदवारी अर्ज

‘"राष्ट्र प्रथम्, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः" हा भाजपा परिवाराचा मूलमंत्र अनुसरून, अंत्योदयाच्या मार्गावर आजवर वाटचाल करत आलो. या वाटचालीत पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोलाची साथ आणि जनतेचे आशीर्वाद लाभले. या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या पाठबळावर आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज केंद्रीय मंत्री किरेनजी रिजिजू यांच्याकडे सुपूर्द केला. यापुढच्या वाटचालीत देखील तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मोलाचे ठरणार आहेत,’ असे रविंद्र चव्हाण म्हणाले.



Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

बाप्पाच्या दर्शनासाठी राज ठाकरेंच्या घरी जाणार उद्धव ठाकरे

मुंबई : गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी जाणार आहेत.

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण