चॉकलेटचा हट्ट धरला म्हणून दारुड्या बापाकडून लेकीची हत्या, आईने केली फाशीची मागणी

  43

लातूर: उदगीर तालुक्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दारूच्या आधीन गेलेल्या वडिलांनी आपल्या चार वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून केला असल्याची घटना घडली आहे. बालाजी राठोड असे या निर्दयी बापाचे नाव आहे. 


राठोडला दारूचे प्रचंड व्यसन होते, त्यामुळे त्याच्या कुटुंबात वारंवार भांडणे होत होती. यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून तिच्या वाडिलांच्या घरी गेली होती. दरम्यान घरात ४ वर्षाची मुलगी आरुषी एकटी होती, त्यावेळी तिने आपल्या वडिलांकडे चॉकलेटसाठी पैसे मागितले होते. दरम्यान, राठोड यावेळी सुद्धा मद्यपान करत होता, आणि त्या नशेत त्याने आपल्या मुलीचा गळाच दाबला. ज्यात त्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती संबंधित वृत्तसंस्थेला दिली.


सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार,  "आरोपीचे नाव बालाजी राठोड आहे, ज्याला आपल्या चार वर्षाच्या मुलीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे." पोलिसांनी हत्येची माहिती देताना सांगितले की, "आरोपीला दारूचे व्यसन असल्यामुळे त्याचे घरगुती वाद भरपूर होते. त्याची पत्नी त्याला सोडून तिच्या माहेरी गेली होती, या दरम्यान दुपारी त्याची मुलगी आरुषीने त्याच्याकडे चॉकलेट खरेदी करण्यासाठी पैसे मागितले. त्यावेळी  रागाच्या भरात आरोपीने साडीने तिचा गळा दाबून खून केला."



पतीला फाशीची देण्याची मागणी


राठोडची पत्नी वर्षा हिने तिच्या पतीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आरोपी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथील रहिवासी आहे. त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे आणि त्याला अटक केली आहे. या प्रकरणात पुढील कारवाई सुरू आहे.

Comments
Add Comment

AT Capital Foundation Thane Creek: ठाणे खाडीच्या स्वच्छतेसाठी एटी कॅपिटल फाऊंडेशनचा पुढाकार

 १.५ मिलियन यूरोचे अर्थसहाय्य देणार; दरवर्षी ३८५ टन कचरा रोखण्याची अपेक्षा - प्रतिनिधी: ठाणे खाडीच्या

भारत-पाक सीमेवर आढळले दोन मृतदेह, पाकिस्तानी सिम-ओळखपत्रे जप्त

जयपूर: राजस्थानमधील जैसलमेर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर एक अल्पवयीन मुलगी आणि एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Assembly Session: पावसाळी अधिवेशनासाठी सुलभा खोडके तालिका सभाध्यक्ष

मुंबई: राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२५ ला आज सोमवार दिनांक ३० जुनपासून मुंबई येथे सुरुवात झाली आहे.

Nirmala Sitharaman: निर्मला सीतारामन आजपासून स्पेन, पोर्तुगाल, ब्राझील दौऱ्यावर! FFD4 व Bricks मध्ये होणार 'ही' महत्वपूर्ण चर्चा!

प्रतिनिधी: केंद्रीय अर्थमंत्री व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन ३० जून ते ५ जुलै दरम्यान स्पेन,

पुणे जिल्ह्यात 'जल जीवन मिशन'ची यशस्वी वाटचाल

पुणे : पुणे जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! 'हर घर जल' अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील सुमारे चार लाख

Karnataka Bank: सीईओच्या राजीनाम्यानंतर कर्नाटक बँकेचे शेअर 'इतक्या' % Crash

प्रतिनिधी: कर्नाटक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या राजीनाम्याने बँकेचा समभाग