काळू धरणातील विस्थापितांचे पुनर्वसन खापरी गावात नको

  88

स्थानिक ग्रामस्थांचे मुरबाड तहसीलदारांना निवेदन

मुरबाड : ठाणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी तालुक्यातील काळू नदीवरील प्रस्तावित धरणग्रस्तांचे पुनर्वसन खापरी गावात नको अशी भूमिका खापरी ग्रामस्थांनी घेतली असून शासनाच्या या निर्णयावर आक्षेप घेत त्यांनी तहसिलदार यांना निवेदन दिले आहे.

मुरबाड, शहापूर तालुक्यातील खेडोपाड्यांसह दुर्गम भागातील वस्ती आजही पाण्यावाचून वंचित असून धरण उशाला तर कोरड घश्याला अशी जनतेची परिस्थिती झाली आहे. कोट्यावधींच्या जलजीवन मिशन योजनाही ठेकेदारांच्या घश्यात गेल्या असून प्रस्तावित काळू धरणाचा फायदा धनदांडगे आणि शहरांना होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. धरणाचा फायदा शहरांची तहान भागवण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांचा बळी घेतला जातो. कोयना, बारवी, तानसा, भातसा, ही धरण बांधून मुंबईकर पाणी पित आहेत. मात्र ज्यांच्यावर अन्याय झाला ते चाळीस पन्नास वर्ष न्यायासाठी झगडत आहेत. आता असाच घाट मुरबाड तालुक्यात काळु धरण बांधण्याचा घातला जात आहे. धरण परिसरातील गावे उध्वस्त होणारच आहेत. परंतू त्यांचे पूनर्वसन खापरी, बळेगांव, सायले इत्यादी गावात करून या गावांचा आर्थिक, सामाजिक, राजकीय समतोल बिघडवण्याचे काम शासन करु पाहत आहे, अशी येथील ग्रामस्थांची भावना निर्माण झाली आहे. धरणात बाधीत होणाऱ्या गावांना धरण पाहिजे असेल तर जरूर करा पण, आमच्या गावात त्यांचे पूनर्वसन नको अशी भूमिका खापरी ग्रामस्थांची असून तसे निवेदन त्यांनी मुरबाड तहसीलदारांना दिले आहे.

काळू, शाई धरणात बाधित होणाऱ्या गावांचे पुनर्वसनाची यादी शासनाने प्रसिद्ध केली आहे. या यादीमुळे एकीकडे स्थलांतरित गावातील नागरिकांत संभ्रमाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे विस्थापितांचे पुनर्वसन खापरी, सायले, बळेगाव धरणाखालील गावात करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पण खापरी गावातील नागरिकांना शेती व्यतिरिक्त कोणताच व्यवसाय नाही. जोडव्यवसाय म्हणून प्रापंचिक खर्च भागवण्यासाठी दुग्धव्यवसाय केला जातो. अशा गावातील जमीन काळू धरणात विस्थापित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी संपादित केल्यास खापरी येथील शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन हिरावणार असल्याने उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे काळू धरणातील बाधित शेतकऱ्यांचे पुनर्वसन खापरी गावात नको, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली असून तशा प्रकारचे निवेदन तहसीलदार यांना दिले आहे.

Comments
Add Comment

नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन यांचे निधन

चेन्नई: नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन (L.A. Ganesan) यांचे शुक्रवारी (१५ ऑगस्ट, २०२५) रात्री चेन्नई येथील रुग्णालयात निधन

Health: हे वाचल्यानंतर तुम्ही दररोज पोळीला तूप लावून खाल

मुंबई: भारतीय जेवणात पोळीला तूप लावून खाणे ही जुनी परंपरा आहे. अनेक वर्षांपासून ही पद्धत चालत आलेली आहे, पण केवळ

प्रत्येक वेळेस थोडीच रिटायरमेंट घेणार?' रोहित शर्माने निवृत्तीवर दिले मजेशीर उत्तर, पंतने शेअर केला व्हिडिओ

मुंबई: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने

Accident news: स्वातंत्र्यदिनी मोठा बस अपघात! १० जणांचा जागीच मृत्यू, ३५ प्रवासी जखमी

बर्दवान: देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून

Independence Day 2025: विकासाच्या वाटचालीत मोदी सरकारला साथ द्या: मंत्री मंगलप्रभात लोढा

गोंदिया:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मागील ११ वर्षांत जलद गतीने प्रगती साधली असून भारत

दिल्ली : हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायूं मकबऱ्यामध्ये भिंत कोसळल्याची