शेफाली जरीवालाच्या मृत्यचं कारण अँटी एजिंग ट्रीटमेंट आहे का? समोर आलं सत्य...

मुंबई : 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील 'कांटा लगा' या गाण्यामुळे शेफाली जरीवाला हे नाव लोकप्रिय झालं होत.शेफाली जरीवाल तरुणांच्या गळ्यातील ताईत होती. तिचा जन्म अहमदाबादमध्ये झाला. आशा पारेख यांच्या 'कांटा लगा' या चित्रपटातील गाण्याचा म्युझिक व्हिडिओ २००२ मध्ये तिने रिक्रिएट केला. हे गाण 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटात वापरल होत. शेफालीच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. सलमान खानच्या लोकप्रिय शो 'बिग बॉस १३' मध्ये तिने भाग घेतला होता. बिग बॉसच्या या घराने तिला वेगळी ओळख मिळवून दिली. ती सध्या अंधेरी स्थित लोखंडवाला मध्ये राहत होती. शेफालीने शुक्रवारी (२७ जून २०२५) रात्री ११ वाजता छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर तिचा पती तिला रुग्णालयात घेऊन गेला.परंतु दुर्दैवाने वयाच्या ४२ व्या वर्षी झालेल्या तिच्या अकाली निधनाने चाहते आणि मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

सध्या शेफालीच्या मृत्यूच्या कारणाचा तपास सध्या वेगाने सुरु आहे. शेफाली तिच्या मृत्यूपूर्वी पाच ते सहा वर्ष वृद्धत्वविरोधी उपचार घेत होती. अहवालात म्हटले आहे की या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये व्हिटॅमिन सी आणि ग्लूटाथिओनचा समावेश होता.परंतु एका डॉक्टरनी सांगितले की , "ग्लुटाथिओन हे त्वचा उजळवण्यासाठी आणि विषमुक्त करण्यासाठी वापरले जाणारे औषध आहे. या औषधाचा हृदयावर थेट परिणाम होत नाही आणि हे पूर्णपणे कॉस्मेटिक उपचार आहेत."

शेफालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. शेफालीने ३ दिवसांपूर्वी एक फोटोशूट केले होते. नंतर ती घरीच होती. यामुळे शेफालीला नेमके काय झाले याचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीम शेफालीच्या घरातून नमुन्यांचे (सँपल्स) संकलन केले आहे. पोलिसांनी शेफाली ज्या इमारतीत राहत होती तिथले सुरक्षा रक्षक (वॉचमन), शेफालीचे शेजारी, शेफालीचा पती आणि शेफालीला रुग्णालयात नेत असताना तिच्यासोबत असलेल्या सर्वांची कसून चौकशी सुरू केली आहे. शेफालीच्या घरात काम करणाऱ्या नोकरांची आंबोली पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.
Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये बॉलिवूडप्रेमींसाठी 'धुरंधर'ची पायरसी जोरात

कराची : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा हिंदी चित्रपट भारतात सुपरहिट झाला. अनिवासी भारतीय पण मोठ्या संख्येने हा

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद

Valentines Day: अभिनेत्री नम्रता गायकवाड 'काहीतरी वेगळे' करणार? चर्चांना उधाण

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नम्रता गायकवाड हीने अभिनेता तुषार कावळे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करून

The Lalla Anthem: अनिल कपूर आणि हरभजन सिंह यांचा दमदार संदेश – इंडियन क्रिकेट टीमशी भिडलात तर परिणाम भोगावे लागतील!

अनिल कपूर आणि राधिका मदान अभिनित ‘लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’ या गाण्यात भारताचे माजी क्रिकेटपटू

एडिट केलेलं फुटेज जाहीर करा’; ‘बिग बॉस मराठी’च्या निर्मात्यांना दिव्या शिंदेचा कायदेशीर इशारा

मुंबई : बिग बॉस मराठी’मधून बाहेर पडल्यानंतर स्पर्धक दिव्या शिंदेने निर्मात्यांवर गंभीर आरोप करत कायदेशीर

Rajpal Yadav's Brother Statement: अभिनेता राजपाल यादवच्या भावाने केले मोठे खुलासे; काय म्हणाले श्रीपाल यादव?

मुंबई: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव नऊ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक वाद प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. ५