शेफाली जरीवालाच्या मृत्यचं कारण अँटी एजिंग ट्रीटमेंट आहे का? समोर आलं सत्य...

मुंबई : 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील 'कांटा लगा' या गाण्यामुळे शेफाली जरीवाला हे नाव लोकप्रिय झालं होत.शेफाली जरीवाल तरुणांच्या गळ्यातील ताईत होती. तिचा जन्म अहमदाबादमध्ये झाला. आशा पारेख यांच्या 'कांटा लगा' या चित्रपटातील गाण्याचा म्युझिक व्हिडिओ २००२ मध्ये तिने रिक्रिएट केला. हे गाण 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटात वापरल होत. शेफालीच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. सलमान खानच्या लोकप्रिय शो 'बिग बॉस १३' मध्ये तिने भाग घेतला होता. बिग बॉसच्या या घराने तिला वेगळी ओळख मिळवून दिली. ती सध्या अंधेरी स्थित लोखंडवाला मध्ये राहत होती. शेफालीने शुक्रवारी (२७ जून २०२५) रात्री ११ वाजता छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर तिचा पती तिला रुग्णालयात घेऊन गेला.परंतु दुर्दैवाने वयाच्या ४२ व्या वर्षी झालेल्या तिच्या अकाली निधनाने चाहते आणि मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

सध्या शेफालीच्या मृत्यूच्या कारणाचा तपास सध्या वेगाने सुरु आहे. शेफाली तिच्या मृत्यूपूर्वी पाच ते सहा वर्ष वृद्धत्वविरोधी उपचार घेत होती. अहवालात म्हटले आहे की या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये व्हिटॅमिन सी आणि ग्लूटाथिओनचा समावेश होता.परंतु एका डॉक्टरनी सांगितले की , "ग्लुटाथिओन हे त्वचा उजळवण्यासाठी आणि विषमुक्त करण्यासाठी वापरले जाणारे औषध आहे. या औषधाचा हृदयावर थेट परिणाम होत नाही आणि हे पूर्णपणे कॉस्मेटिक उपचार आहेत."

शेफालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. शेफालीने ३ दिवसांपूर्वी एक फोटोशूट केले होते. नंतर ती घरीच होती. यामुळे शेफालीला नेमके काय झाले याचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीम शेफालीच्या घरातून नमुन्यांचे (सँपल्स) संकलन केले आहे. पोलिसांनी शेफाली ज्या इमारतीत राहत होती तिथले सुरक्षा रक्षक (वॉचमन), शेफालीचे शेजारी, शेफालीचा पती आणि शेफालीला रुग्णालयात नेत असताना तिच्यासोबत असलेल्या सर्वांची कसून चौकशी सुरू केली आहे. शेफालीच्या घरात काम करणाऱ्या नोकरांची आंबोली पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.
Comments
Add Comment

बिग बॉस १९ स्पर्धकांना दाखवली ट्रॉफीची पहिली झलक, टॉप ५ स्पर्धकांचे डोळे दिपले

मुंबई : बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना घरातील पाच फायनलिस्ट निश्चित झाले आहेत. बिग बॉसने या सीझनच्या

रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या आगामी चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. काही

प्राजक्तानं नंदीवरुन घेतलेली एन्ट्री योग्य की अयोग्य ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

मुंबई : नुकताच स्वराज्यरक्षक संभाजी फेम येसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा विवाह सोहळा झाला.

रीलस्टार जोडपं निघाले सराईत चोर! आयफोन 17 प्रो मॅक्स, साडे सहा तोळे सोन्याचे दागिने आणि लाखो रुपये...

अहिल्यानगर: जिल्हा पोलिस दलाने बसमधून महिलांच्या पर्स चोरी करणाऱ्या एका सराईत जोडप्याला जेरबंद केले आहे. या

‘व्ही. शांताराम’ यांचे जीवन मेगा बायोपिकच्या रूपात

भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे

हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्या-फुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी