
मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर सेवा केंद्राने अत्यंत महत्वाचा इशारा दिला आहे. कोकण किनारपट्टीवर ३० जुलै २०२५ रोजी ३.४ ते ३.५ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला. त्यामुळे राज्य आपत्कालीन विभाग लोकांच्या सेवेसाठी सतर्क आहे. राज्यात गेल्या २४ तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ मीमी पाऊस झाला तर पालघर जिल्ह्यात १६.१ रत्नागिरी जिल्ह्यात १५.२ रायगड जिल्ह्यात ११.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुढील २४ तासात पावसाचा जोर वाढू शक्यतो सतर्कतेचा इशारा म्हणून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आले आहेत
कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस झाला.
गेल्या २४ तासात पुढील पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच राज्यात शुक्रवार २८ जून पासून शनिवार २९ जून सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी मिलिमीटरमध्ये नोंद करण्यात आली. पुढील जिल्ह्यांमध्ये ठाणे ९.९, रायगड ११.९, रत्नागिरी १५.२, सिंधुदुर्ग १९, पालघर १६.१, नाशिक ४.६, धुळे ९.४, नंदुरबार १.६, जळगाव १.९, अहिल्यानगर ०.४, पुणे ५.५, सोलापूर०.१, सातारा ७.१, सांगली ०.३, कोल्हापूर १५.२, छत्रपती संभाजीनगर ०.३, जालना ०.१, बीड ०.१,धाराशिव ०.१, नांदेड २.१, परभणी ०.६, हिंगोली ०.४, बुलढाणा ०.१, अकोला ०.४, वाशिम ०.२, अमरावती ०.३, यवतमाळ ३.४, वर्धा १.६, नागपूर ८.२, बुलढाणा १६, गोंदिया २२, चंद्रपूर ४.४ आणि गडचिरोली जिल्ह्यात १०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड गावात पावसामुळे डोंगराळ उतारावर जमिनीस भेग पडायला सुरवात झाली असून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे. तरी दर ठिकाण भूस्खलन प्रवण असून, संततधार पाऊस पडत असल्याने भूस्खलनाची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षेतेच्या दृष्टीने तेथील रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे, त्यामुळे पर्यायी मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.