
सावित्री ठाकूर
प्रगतीची नवी व्याख्या
पूर्वी डिजिटल साक्षरता मोठ्या शहरांपर्यंतच मर्यादित होती, मात्र तिची व्याप्ती कमी होती आणि ग्रामीण महिलांसाठी तर तंत्रज्ञान नावाची एखादी गोष्टच अस्तित्वात नव्हती. मात्र डिजिटल इंडिया मिशनअंतर्गत सुरू केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. विशेषतः २०१७ मध्ये प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान या योजनेने कोट्यवधी ग्रामीण महिलांना डिजिटल स्वरूपात सक्षम केले आहे. आता त्या स्मार्टफोन, इंटरनेट आणि डिजिटल साधनांच्या माध्यमातून सरकारी योजना, बँकिंग सेवा, टेलिमेडिसिन आणि इतर सुविधांचा थेट लाभ घेत आहेत. या अभियानांतर्गत ६ कोटींहून अधिक लोकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे,
२०१४ मध्ये सुरू झालेली प्रधानमंत्री जन धन योजना, जी जनधन, आधार, मोबाईल यांच्या त्रिसूत्री सोबत मिळून जगातील सर्वात मोठा आर्थिक समावेशन कार्यक्रम बनली आहे. तिने भारतात आर्थिक सक्षमीकरणाची नवी गाथा लिहिली आहे. पूर्वी जिथे कोट्यवधी महिलांकडे बँक खाती सुद्धा नव्हती आणि सरकारी लाभाचे पैसे मध्यस्थांच्या हातात जात होते, तिथे आता जनधन, आधार आणि मोबाईलच्या त्रिसूत्रीने आर्थिक समावेशनाला एक नवी दिशा दिली आहे. या डिजिटल क्रांतीमुळे महिला थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये सरकारी योजनांचा लाभ मिळवत आहे.
डिजिटल कौशल्य आणि भविष्याची तयारी
तंत्रज्ञान-आधारित मंचांनी शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात महत्त्वाचे बदल घडवले आहेत. स्किल इंडिया मिशन आणि ई-स्किल इंडियासारख्या कार्यक्रमांमुळे लाखो मुलींना आणि महिलांना आता त्यांच्या मोबाईलवर प्रशिक्षण मिळत आहे. यामुळे त्या उत्तम कौशल्ये शिकून स्वावलंबी बनत आहेत आणि रोजगाराच्या नवीन संधी प्राप्त करू शकत आहेत. हा बदल पूर्वीची मर्यादित संसाधने आणि पोहोच यापेक्षा खूपच जास्त व्यापक आणि सशक्त आहे. SWAYAM आणि DIKSHA सारख्या पोर्टल्सनी महिलांना शिक्षणाशी जोडण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे, विशेषतः कोरोना महामारीच्या काळात जेव्हा संपूर्ण जग थांबल्यासारखे झाले होते. आता महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि कौशल्य विकास मंत्रालय यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत १९ राज्यांमधील २७ जिल्ह्यांमध्ये किशोरवयीन मुलींना डिजिटल साक्षरतेसोबतच रोजगारभिमुख प्रशिक्षण दिले जात आहे.
डिजिटल युगात महिला उद्योजकतेला नवे बळ
एक काळ होता, ज्यावेळी महिलांचे लहान व्यवसाय घराच्या चार भिंतींपुरतेच मर्यादित होते आणि बाजारापर्यंत पोहोचणे हे एक मोठे आव्हान होते. पण, गेल्या काही वर्षांत महिलाप्रणीत स्टार्टअप्स आणि लघू उद्योगांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग आणि ऑनलाइन पेमेंट प्रणालीने त्यांना एक उद्योजक म्हणून पुढे जाण्याचा आणि स्वतःचा ब्रँड तयार करण्याचा आत्मविश्वास दिला आहे.
आरोग्य, पोषण आणि सुरक्षेत तंत्रज्ञानाची भूमिका
POSHAN ट्रॅकर, RCH पोर्टल आणि eSanjeevani यांसारख्या डिजिटल साधनांनी माता आणि मुलांशी संबंधित आरोग्य सेवांच्या देखरेखीला अत्यंत सोपे आणि प्रभावी बनवले आहे. आता अंगणवाडी सेविका आणि आशा भगिनी मोबाईल अॅप्सच्या मदतीने लाभार्थींची देखरेख, अहवाल देणे आणि सेवा वितरणाचे काम सहजपणे करू शकत आहेत. मोदी सरकारने ERSS-११२, पॅनिक बटण आणि महिला सुरक्षा अॅप्स यांसारख्या प्रभावी उपायांची अंमलबजावणी केली आहे, ज्यामुळे आता महिला सार्वजनिक ठिकाणी स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित मानत आहेत.
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित यामध्ये महिलांची भागीदारी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित यांसारख्या क्षेत्रांमध्ये मुलींचा सहभाग एकेकाळी मर्यादित मानला जात होता, पण आता परिस्थिती वेगाने बदलत आहे. विज्ञान ज्योती आणि WISE-KIRAN योजनांसारखे उपक्रम विद्यार्थिनींना STEM क्षेत्रांमध्ये आगेकूच करण्यासाठी प्रेरित करत आहेत. भारतीय महिला आता अंतराळ संशोधन, कृत्रिम प्रज्ञा आणि जैवतंत्रज्ञानासारख्या क्षेत्रांमध्ये अग्रगण्य भूमिका बजावत आहेत.
विकसित भारताच्या दिशेने पडणारी पावले
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षांत, डिजिटल तंत्रज्ञानाने महिलांच्या जीवनात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली आहे. २०१४ पासून आतापर्यंत, सर्वसमावेशक धोरणे, सुनियोजित प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या सुलभतेमुळे लाखो महिलांना आत्मनिर्भरतेच्या मार्गावर आणले आहे. अमृत काळाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारतात, हे परिवर्तन महिलांना केवळ विकासातील भागीदारच नव्हे, तर या विकास यात्रेच्या नेत्या बनवत आहे. एक डिजिटली सक्षम महिला आज केवळ लाभार्थी नाही, तर विकसित भारताची निर्माती आहे.
२०१४ मध्ये, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात एका निर्णायक बदलाची सुरुवात झाली, तेव्हापासून भारताने डिजिटल प्रगतीची एक नवीन दिशा निश्चित केली. या ११ वर्षांत 'डिजिटल इंडिया मिशन' सारख्या लोक-केंद्रित मोहिमांनी कोट्यवधी नागरिकांच्या जीवनावर प्रभाव टाकला आहे. विशेषतः महिलांसाठी हे परिवर्तन आत्मनिर्भरता, सक्षमीकरण आणि सन्मानाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ठरले आहे. आजच्या २१व्या शतकात तंत्रज्ञान केवळ प्रशासन आणि अर्थव्यवस्थेमध्येच नाही, तर सामाजिक रचनेतही बदल घडवत आहे आणि या बदलाचे सर्वात सशक्त उदाहरण म्हणजे त्या महिला आहे. ज्या डिजिटल युगात नवीन संधींसह नवी भरारी घेत आहे.
लेखिका केंद्रीय महिला आणि बाल विकास राज्यमंत्री आहेत