Pratap Sranaik : "वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंग व्यवस्थेत बदल करणार" प्रताप सरनाईक यांनी दिले आदेश...

मुंबई : रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावून अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये  पार्किंग व्यवस्था आणणे महत्त्वाचे आहे.  त्या अनुषंगाने मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA ) प्रदेशात नगरविकास विभागाने आपल्या नियमांमध्ये मध्ये पार्किंग व्यवस्थेवर आधारित आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. असं मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची व्यक्त केलं आहे.


तसेच प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये  परिवहन विभागाचे अतिरिक्त सचिव संजय सेठी , नगरविकास विभागाचे अतिरिक्त सचिव असिम गुप्ता तसेच परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी- निजामपुर, पनवेल, मीरा-भाईंदर, वसई विरार या महापालिकेचे आयुक्त उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले भविष्यात शहराच्या विकास आराखड्यात मध्ये महापालिकेने पार्किंग साठी विशेष जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक ठरणार आहे.


त्या अनुषंगाने नगरविकास विभागाने आपल्या नियमामध्ये बदल करून नवीन १४ सुचनांचा समावेश असलेला आराखडा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA ) प्रदेशातील महापालिकांना पाठवावा. असे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्री सरनाईक म्हणाले "भविष्यात शहराच्या विकास आराखड्यात मध्ये महापालिकेने पार्किंगसाठी विशेष जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक ठरणार आहे. त्या अनुषंगाने नगरविकास विभागाने आपल्या नियमावली मध्ये बदल करून नवीन १४ सुचनांचा समावेश असलेला आराखडा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA ) प्रदेशातील महापालिकांना पाठवावा." असे सरनाईक म्हणाले.


 नगर विकास खात्याचे अतिरिक्त सचिव असीम गुप्ता म्हणाले, भविष्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या अवैध पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेने आपल्या मोकळ्या जागेवर पे ॲड पार्क वर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे .तसेच खाजगी सोसायटी व जागा मालकांच्या पूर्व परवानगीने कार्यालयीन वेळेच्या पश्चात(रात्री १२-६) पे ॲड पार्क वर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी देखील महापालिकेने चाचपणी करणे आवश्यक आहे. याबरोबरच जे रस्ते रुंद आहेत, त्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही अशा प्रकारे महापालिकेने एक दिवस आड पार्किंग व्यवस्था निर्माण केली पाहिजे .तसेच पे ॲड पार्क वर आधारित असलेली पार्किंग व्यवस्था ही मनुष्य हस्तक्षेपा शिवाय होण्यासाठी फास्ट टॅग वर आधारित असल्यास लोकांना त्याचा सहज वापर करणे शक्य होईल.
याबरोबरच पार्किंगचे शुल्क हे अतिशय कमी ठेवावेत जेणेकरून लोकांना परवडेल आणि ते सहजगत्या उपलब्ध पार्किंग व्यवस्थेचा फायदा घेतील . अशी सूचना मंत्री सरनाईक यांनी यावेळी केली.


भुमीअंतर्गत पार्किंग व्यवस्था निर्माण करा


महानगरातील जागेची कमतरता लक्षात घेता उद्याने व बगीचा याच्या खाली भूमीअंतर्गत पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, ठाणे शहरांमध्ये ठाणे महापालिकेने अशा प्रकारचा उपक्रम राबवला असून तो पारदर्शक असल्यामुळे इतर महापालिकेने देखील त्याचं अनुकरण करावं. असे मार्गदर्शन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

Comments
Add Comment

मुंबईतील २५२ कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा: सलीम शेखच्या कबुलीजबाबाने खळबळ

मुंबई : देशभरात खळबळ माजवणाऱ्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठा धागा मिळाला

घाटकोपरमध्ये रस्ता रुंदीकरणातील अडथळा झाला दूर

बाधित २४ बांधकामांवर झाली अखेर कारवाई मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते

उत्तर पश्चिम जिल्ह्यात महायुतीचे ३२ ते ३३ नगरसेवक निवडून आणणार

भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड ज्ञानमूर्ती शर्मा यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई (सचिन धानजी) : उत्तर पश्चिम लोकसभा

लाडकी बहीण योजनेची वेबसाईट होत आहे अपग्रेड

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा सोळावा

दहिसरच्या राजकारणात उलथापालथ, वॉर्ड क्रमांक १ घोसाळकर कुटुंबाच्या आवाक्याबाहेर!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण राजकारणात हालचाली सुरू झाल्या आहेत. दहिसरमधील

शीतल म्हात्रे यांचा मोठा निर्णय : महापालिका निवडणूक लढवणार नाही, आमदारकीवर लक्ष केंद्रित!

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.