मनाने, शरीराने सुदृढ राहिलात, तरच आयुष्याची लढाई जिंकाल

विश्वास नांगरे-पाटील यांनी महापालिका शाळांमधील मुलांच्या पंखात भरले बळ


मुंबई  : सध्याच्या विद्यार्थ्यांभोवती, नव्या पिढीभोवती मोबाईलचा विळखा आहे. या आभासी जगाच्या मोहात न अडकता आयुष्याचे ध्येय ठरवा. त्यानंतर ते गाठण्यासाठी अभ्यासाचे, वेळेचे नियोजन करा. संघर्ष करण्याची तयारी ठेवा. मनाने आणि शरीराने सुदृढ राहिलात, तरच आयुष्याची लढाई जिंकाल, असा शब्दांचे बळ अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) विश्वास नांगरे – पाटील यांनी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पंखात भरले.


मार्गदर्शनपर केलेल्या भाषणात नांगरे-पाटील यांनी दिलेले वैविध्यपूर्ण दाखले, स्वानुभव ऐकून उपस्थित विद्यार्थी अक्षरश: भारावले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १०वी) परीक्षेत मुंबई महानगरपालिकेच्या २४८ माध्यमिक शाळांमधून सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि शाळांचा गुणगौरव सोहळा भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात गुरुवारी २६ जून २०२५ रोजी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने विश्वास नांगरे-पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.


अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आदींसह उपशिक्षणाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे पालक या सोहळ्याला उपस्थित होते. नांगरे-पाटील यांनी त्यांच्या भाषणातून कोकरूड (जि. सांगली) येथील शालेय जीवनापासून तर दिल्ली येथील केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या तयारीपर्यंतचा प्रवास उलगडून दाखविला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून तर स्वामी विवेकानंद यांच्यापर्यंतचे दाखले देत विद्यार्थ्यांना अभ्यासातील सातत्य, नियोजन आणि ध्येयपूर्तीपर्यंत थांबायचं नाही, असे मार्गदर्शन केले.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य