Nirmala Sitharaman :अर्थमंत्री निर्मला सीतारामन पीएसयु बँकांची घेणार नवी दिल्लीत बैठक 'या' मुद्यांवर चर्चा अपेक्षित

  59

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पब्लिक सेक्टर बँकांच्या अडचणी समजून घेण्याबरोबरच त्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीत नुकतीच बैठक घेणार आहेत. यामध्ये बँकेच्या आर्थिक स्थितीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.या बैठकीत अर्थ केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी, वित्त सचिव एम नागराजू व इतर अधिकारीही हजर असतील. याशिवाय बँकिंग तज्ञांसह सरकारी बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहू शकतात.

नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात (Repo Lending Rate) मध्ये अनपेक्षित कपात केली होती. हा दर ६% वरून ५० बेसिस पूर्णांकाने कपात करत ५.५०% वर आणला होता. त्यामुळे बाजारात अतिरिक्त तरलता (Liquidity) निर्माण होण्याबरोबरच अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली होती. बँकेने सीआरआर (Cash Reserve Ratio CRR) दरात ५० बेसिसने कपात केली होती. मात्र सगळी परिस्थिती काही आलबेल नाही. एनपीए कमी करण्यासोबतच बँकेच्या नफ्यात कशी वाढ करता येईल बँकांचे भविष्य व इतर आर्थिक मुद्यांवर चर्चा अपेक्षित आहे.

सध्याच्या घडीला देशात १२ सरकारी पीएसयु (Public Sector Undertaking PSU) बँका आहेत. १.७८ कोटींचा नफा बँकांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत कमावला होता. आकडेवारीनुसार या बँकांनी २६% वाढ दर्शविली होती. पहिल्यांदाच आर्थिक वर्ष २०२५ मध्ये खाजगी बँकाहून या बँकेत कर्ज विक्रीत वाढ झाली होती. २०११ पासून ही झालेली पहिल्यांदा वाढ होती. ही वाढ इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १३.१% टक्के दर्शविली होती.

याशिवाय बाजारातील अहवालानुसार मार्च २०१५ नंतर क्रेडिट ग्रोथमध्ये वाढ होत असली तरी ती संथपणे सुरु आहे दुसरीकडे जागतिक पातळीवर दबाव असतानाही खाजगी बँकापेक्षा पीएसयु बँकांच्या समभागांनी (Shares) नी चांगली कामगिरी केली होती. ही वाढ विशेषतः गृह कर्ज वाढीमुळे दर्शविली गेली होती.
Comments
Add Comment

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

Ajit Pawar: मतचोरीच्या आरोपांवर अजितदादांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले "फेक नरेटीव्ह...

मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले,  त्यानंतर देशभरात वातावरण

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात