Nirmala Sitharaman :अर्थमंत्री निर्मला सीतारामन पीएसयु बँकांची घेणार नवी दिल्लीत बैठक 'या' मुद्यांवर चर्चा अपेक्षित

  52

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पब्लिक सेक्टर बँकांच्या अडचणी समजून घेण्याबरोबरच त्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीत नुकतीच बैठक घेणार आहेत. यामध्ये बँकेच्या आर्थिक स्थितीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.या बैठकीत अर्थ केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी, वित्त सचिव एम नागराजू व इतर अधिकारीही हजर असतील. याशिवाय बँकिंग तज्ञांसह सरकारी बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहू शकतात.

नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात (Repo Lending Rate) मध्ये अनपेक्षित कपात केली होती. हा दर ६% वरून ५० बेसिस पूर्णांकाने कपात करत ५.५०% वर आणला होता. त्यामुळे बाजारात अतिरिक्त तरलता (Liquidity) निर्माण होण्याबरोबरच अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली होती. बँकेने सीआरआर (Cash Reserve Ratio CRR) दरात ५० बेसिसने कपात केली होती. मात्र सगळी परिस्थिती काही आलबेल नाही. एनपीए कमी करण्यासोबतच बँकेच्या नफ्यात कशी वाढ करता येईल बँकांचे भविष्य व इतर आर्थिक मुद्यांवर चर्चा अपेक्षित आहे.

सध्याच्या घडीला देशात १२ सरकारी पीएसयु (Public Sector Undertaking PSU) बँका आहेत. १.७८ कोटींचा नफा बँकांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत कमावला होता. आकडेवारीनुसार या बँकांनी २६% वाढ दर्शविली होती. पहिल्यांदाच आर्थिक वर्ष २०२५ मध्ये खाजगी बँकाहून या बँकेत कर्ज विक्रीत वाढ झाली होती. २०११ पासून ही झालेली पहिल्यांदा वाढ होती. ही वाढ इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १३.१% टक्के दर्शविली होती.

याशिवाय बाजारातील अहवालानुसार मार्च २०१५ नंतर क्रेडिट ग्रोथमध्ये वाढ होत असली तरी ती संथपणे सुरु आहे दुसरीकडे जागतिक पातळीवर दबाव असतानाही खाजगी बँकापेक्षा पीएसयु बँकांच्या समभागांनी (Shares) नी चांगली कामगिरी केली होती. ही वाढ विशेषतः गृह कर्ज वाढीमुळे दर्शविली गेली होती.
Comments
Add Comment

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

मरेपर्यंत अशा लोकांना समाजात मिळत नाही मान, होतो सतत अपमान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण