Nirmala Sitharaman :अर्थमंत्री निर्मला सीतारामन पीएसयु बँकांची घेणार नवी दिल्लीत बैठक 'या' मुद्यांवर चर्चा अपेक्षित

  21

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पब्लिक सेक्टर बँकांच्या अडचणी समजून घेण्याबरोबरच त्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीत नुकतीच बैठक घेणार आहेत. यामध्ये बँकेच्या आर्थिक स्थितीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.या बैठकीत अर्थ केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी, वित्त सचिव एम नागराजू व इतर अधिकारीही हजर असतील. याशिवाय बँकिंग तज्ञांसह सरकारी बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहू शकतात.

नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात (Repo Lending Rate) मध्ये अनपेक्षित कपात केली होती. हा दर ६% वरून ५० बेसिस पूर्णांकाने कपात करत ५.५०% वर आणला होता. त्यामुळे बाजारात अतिरिक्त तरलता (Liquidity) निर्माण होण्याबरोबरच अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली होती. बँकेने सीआरआर (Cash Reserve Ratio CRR) दरात ५० बेसिसने कपात केली होती. मात्र सगळी परिस्थिती काही आलबेल नाही. एनपीए कमी करण्यासोबतच बँकेच्या नफ्यात कशी वाढ करता येईल बँकांचे भविष्य व इतर आर्थिक मुद्यांवर चर्चा अपेक्षित आहे.

सध्याच्या घडीला देशात १२ सरकारी पीएसयु (Public Sector Undertaking PSU) बँका आहेत. १.७८ कोटींचा नफा बँकांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत कमावला होता. आकडेवारीनुसार या बँकांनी २६% वाढ दर्शविली होती. पहिल्यांदाच आर्थिक वर्ष २०२५ मध्ये खाजगी बँकाहून या बँकेत कर्ज विक्रीत वाढ झाली होती. २०११ पासून ही झालेली पहिल्यांदा वाढ होती. ही वाढ इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १३.१% टक्के दर्शविली होती.

याशिवाय बाजारातील अहवालानुसार मार्च २०१५ नंतर क्रेडिट ग्रोथमध्ये वाढ होत असली तरी ती संथपणे सुरु आहे दुसरीकडे जागतिक पातळीवर दबाव असतानाही खाजगी बँकापेक्षा पीएसयु बँकांच्या समभागांनी (Shares) नी चांगली कामगिरी केली होती. ही वाढ विशेषतः गृह कर्ज वाढीमुळे दर्शविली गेली होती.
Comments
Add Comment

झिशान सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन सोडले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून

अलिबाग-वडखळ महामार्गावर खड्डेच खड्डे; लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

अलिबाग : अतिवृष्टीमुळे अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गावर केलेली तात्पुरती मलमपट्टी उखडून गेल्याने या

कोकण किनारपट्टीला ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा

मुंबई : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर

व्यायाम केल्यानंतर ही चूक कधीही करू नका ...

मुंबई : फिटनेस जपण्यासाठी चालणे, धावणे, जिम करणे या पद्धतीने घाम गाळण्यावर हल्ली अनेकांचा भर असतो. व्यायाम केला की

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या