पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील काही भागात आजपासून चार दिवस जोरदार पाऊस बरसणार असल्याचं भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागानं म्हटलयं. पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट क्षेत्रात याचा जोर राहिल. तर मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळदार पावसाचा इशारा दिलाय.


​मराठी महिना आषाढ​ सुरु झालाय. आषाढाचं सुंदर वर्णन ​महाकवि कालिदासांच्या 'मेघदूत' या महाकाव्यात ​आहे.​ ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार आचार्य प्र. के. अत्रे यांनीही​ आषाढ महिन्या​चा महिमा वर्णिला आहे. रोहिणी, मृग आणि आर्द्रा नक्षत्रातही ​धो धो पाऊस कोसळतो. त्यामुळं आषाढ महिन्यात सृष्टी हिरवीगार ​ बनते. त्यामुळं डोंगर,दऱ्यात बरसणाऱ्या जलधारा आपल्याला खुणावतात. अशा या आषाढ​ाच्या पहिल्याच दिवशी ​ ​हवामान विभागानं पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट क्षेत्रात​ २६ जून ते २९ जून पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता​ वर्तवलीय.

सध्या उत्तर पूर्व अरबी समुद्र ते दक्षिण झारखंड पर्यत द्रोणीय स्थिती आहे.​ कोकण किनारपट्टीवर पावसाला पोषक वातावरण आहे.त्यामुळं ​राज्यात​ पावसानं पुन्हा कमबॅक केलयं. ज्यात पुढील काही दिवस ​ब​हुतांश भागात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.


हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि सातारा घाटमाथा परिसराला ऑरेज अलर्ट दिलाय. तर मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर,वाशिम, यवतमाळ भागात यलो अलर्ट जाहीर केलाय.

Comments
Add Comment

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना

नेव्हल परिसरातील रायफल चोरी प्रकरणात ट्विस्ट; आरोपी आणि तक्रारदार एकमेकांना ओळखतात

मुंबई: मुंबई पोलीस गुन्हे शाखेने 'नेवी नगर रायफल चोरी' प्रकरणाच्या तपासात एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. आरोपी

तुमच्याकडे गाडी आहे का? तर हे जरूर वाचा...

सीएटने सर्व टायरच्या किमती केल्या कमी मुंबई : भारत सरकारने अ

महावितरण पहिल्या क्रमांकावर, केंद्राच्या क्रमवारीत १०० पैकी मिळाले ९३ गुण

मुंबई : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या क्रमवारीत महावितरणने १०० पैकी ९३ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त, एसटीच्या ७५ बसस्थानकावर 'मोफत वाचनालय'

मुंबई: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या ७५ प्रमुख बस