पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील काही भागात आजपासून चार दिवस जोरदार पाऊस बरसणार असल्याचं भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागानं म्हटलयं. पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट क्षेत्रात याचा जोर राहिल. तर मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळदार पावसाचा इशारा दिलाय.


​मराठी महिना आषाढ​ सुरु झालाय. आषाढाचं सुंदर वर्णन ​महाकवि कालिदासांच्या 'मेघदूत' या महाकाव्यात ​आहे.​ ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार आचार्य प्र. के. अत्रे यांनीही​ आषाढ महिन्या​चा महिमा वर्णिला आहे. रोहिणी, मृग आणि आर्द्रा नक्षत्रातही ​धो धो पाऊस कोसळतो. त्यामुळं आषाढ महिन्यात सृष्टी हिरवीगार ​ बनते. त्यामुळं डोंगर,दऱ्यात बरसणाऱ्या जलधारा आपल्याला खुणावतात. अशा या आषाढ​ाच्या पहिल्याच दिवशी ​ ​हवामान विभागानं पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट क्षेत्रात​ २६ जून ते २९ जून पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता​ वर्तवलीय.

सध्या उत्तर पूर्व अरबी समुद्र ते दक्षिण झारखंड पर्यत द्रोणीय स्थिती आहे.​ कोकण किनारपट्टीवर पावसाला पोषक वातावरण आहे.त्यामुळं ​राज्यात​ पावसानं पुन्हा कमबॅक केलयं. ज्यात पुढील काही दिवस ​ब​हुतांश भागात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.


हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि सातारा घाटमाथा परिसराला ऑरेज अलर्ट दिलाय. तर मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर,वाशिम, यवतमाळ भागात यलो अलर्ट जाहीर केलाय.

Comments
Add Comment

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सारथीने सुरू करावेत : विखे पाटील

मुंबई : उद्योजकांच्या संघटनांशी संपर्क ठेवून औद्योगिक व सेवा क्षेत्रात मागणी असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचे

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,