Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा प्रसारमाध्यमात बातम्या गेल्या काही दिवसांपासून झळकत होत्या. त्यामुळे दुचाकी वाहनचालक संभ्रमात पडलेले आहेत. मात्र केवळ या बातम्या अफवा असून दुचाकी चालकांकडून कोणत्याही प्रकारे टोल घेतला जाणार नाही, असे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली.त्यामुळे दुचाकीस्वार करणाऱ्या वाहनचालकांनी आनंद व्यक्त केला आहे.





दुचाकीस्वारकडून दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार


एनएचएआयच्या नवीन माहितीनुसार दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर धावण्यासाठी टोल भरावा लागेल. ज्या दुचाकीस्वाराने टोल भरण्यास टाळाटाळ केली किंवा फास्टॅग वापरला नाही तर दुचाकीस्वारकडून दोन हजारांचा दंड आकरण्यात येईल, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये दाखवण्यात आलेले होते. अशा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका, असं नितीन गडकरी यांनी आपल्या सोशल मीडियाच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.


मी माध्यमांचा निषेध करतो


नितीन गडकरी म्हणाले की, "काही माध्यमांद्वारे राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांकडून टोल वसूल केला जाणार आहे, अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात आहेत. परंतु, असा कोणताही निर्णय झाला नाही. दुचाकी वाहनांना टोल शुल्कातून सूट देण्यात आली. सत्य जाणून न घेता दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवू नयेत. मी अशा माध्यमांचा निषेध करतो."


 

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

Mithi River : मिठी नदीत डेब्रीज टाकून वाढवले जाते गाळाचे वजन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील मिठी नदीच्या सफाईच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत याचे २७ टक्के काम

Mumbai : पश्चिम उपनगरांतील नाल्यांची, पाणी साचण्याच्या ठिकाणांची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नदीसह मोठ्या आणि छोट्या नाल्‍यातून गाळाच्या सफाई कामे अधिक परिणामकारक आणि पारदर्शकपणे

Desalinate Seawater : समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रालयाची मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईची वाढती तहान भागविण्यासाठी मुंबई महापालिकेच्या खाऱ्या पाण्याचे रासायनिक

Mumbai News : कामाठीपुरातील ७० अनधिकृत फेरीवाले व जुने भंगार विक्रेत्यांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसरातील विविध ठिकाणांवरील सुमारे ७० अनधिकृत फेरीवाले व

Patra Chawl : पत्रा चाळ रहिवाशांना म्हाडाकडून १० टक्के भाडेवाढ मिळणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय; इमारतींची दुरुस्ती करून देण्याचे म्हाडाला निर्देश मुंबई : गेल्या

Bamboo Plantation : कांजूरमार्गमधील कचरा दुर्गंधीवर ‘बांबू’ लागवडीचा उपाय

उपमुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश; कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाची तातडीने कार्यवाही करण्याचे