
मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा प्रसारमाध्यमात बातम्या गेल्या काही दिवसांपासून झळकत होत्या. त्यामुळे दुचाकी वाहनचालक संभ्रमात पडलेले आहेत. मात्र केवळ या बातम्या अफवा असून दुचाकी चालकांकडून कोणत्याही प्रकारे टोल घेतला जाणार नाही, असे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली.त्यामुळे दुचाकीस्वार करणाऱ्या वाहनचालकांनी आनंद व्यक्त केला आहे.
📢 महत्वपूर्ण
कुछ मीडिया हाऊसेस द्वारा दो-पहिया (Two wheeler) वाहनों पर टोल टैक्स लगाए जाने की भ्रामक खबरें फैलाई जा रही है। ऐसा कोई निर्णय प्रस्तावित नहीं हैं। दो-पहिया वाहन के टोल पर पूरी तरह से छूट जारी रहेगी। बिना सच्चाई जाने भ्रामक खबरें फैलाकर सनसनी निर्माण करना स्वस्थ…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 26, 2025
दुचाकीस्वारकडून दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार
एनएचएआयच्या नवीन माहितीनुसार दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर धावण्यासाठी टोल भरावा लागेल. ज्या दुचाकीस्वाराने टोल भरण्यास टाळाटाळ केली किंवा फास्टॅग वापरला नाही तर दुचाकीस्वारकडून दोन हजारांचा दंड आकरण्यात येईल, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये दाखवण्यात आलेले होते. अशा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका, असं नितीन गडकरी यांनी आपल्या सोशल मीडियाच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
मी माध्यमांचा निषेध करतो
नितीन गडकरी म्हणाले की, "काही माध्यमांद्वारे राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांकडून टोल वसूल केला जाणार आहे, अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात आहेत. परंतु, असा कोणताही निर्णय झाला नाही. दुचाकी वाहनांना टोल शुल्कातून सूट देण्यात आली. सत्य जाणून न घेता दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवू नयेत. मी अशा माध्यमांचा निषेध करतो."