केबल-स्टे ब्रीज तयारीचा महानगर आयुक्तांनी घेतला आढावा

  25

पावसाळ्यात पूल सुरू करणार : संजय मुखर्जी


मुंबई : सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) विस्तार प्रकल्पस्थळास डॉ.संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए आणि विक्रम कुमार, अतिरिक्त महानगर आयुक्त (१) एमएमआरडीए यांनी भेट देऊन अंतिम तयारीचा आढावा घेतला. हा ब्रीज पावसाळ्यातच हा जनतेच्या सेवेत सुरू करण्यात येईल, असे मुखर्जी यावेळी म्हणाले.


डॉ. संजय मुखर्जी यावेळी म्हणाले की, ‘या आयकॉनिक ब्रीजचे काम आता अंतिम टप्प्यात असून तो नागरिकांच्या सेवेत लवकरच सुरू करण्यात येणार आहे. हा पूल केवळ वाहतूक कोंडीवरचा उपाय नसून मुंबईसाठी एक नवा लँडमार्कदेखील आहे. नाविन्य आणि परिणामकारकतेचा संगम साधणारे हे उत्तम उदाहरण आहे. मुंबईच्या 'सिमलेस कनेक्टिव्हिटी'च्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.


हा ब्रीज तयार झाल्यामुळे कुर्ला ते विमानतळ सिग्नल-विरहित वाहतूक करता येणार आहे. वाकोला, बीकेसी आणि एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार,त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे.


सध्या सुरू असलेली कामे




  • सूचना फलक बसविणे

  • केबल-स्टे ब्रीजखालील तात्पुरते दिलेले आधार काढणे

  • रंगकाम व अंतिम सौंदर्यीकरण

  • स्ट्रीट लाईट आणि मध्यवर्ती लँडस्केपिंग


अभियांत्रिकी वैशिष्ट्ये




  • दक्षिण आशियातील पहिला अशा प्रकारचा केबल-स्टे ब्रिज.

  • २१५ मीटर लांबीचा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक असलेला पूल.

  • वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील उड्डाणपुलावरून जाणारा ब्रीज.

Comments
Add Comment

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला, हिंदी सक्ती, शक्तीपीठ या मुद्द्यावरुन वातावरण पेटणार; कधी होणार अधिवेशन? जाणून घ्या...

मुंबई : यंदाच्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरलेला आहे. येत्या ३० जून ते १८ जुलै या काळात

ऊर्जा विभागाच्या कामकाजाचा बोर्डीकर यांनी घेतला आढावा

मुंबई  : राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर ऊर्जा पंपाची मागणी पूर्ण करावी. महावितरण, महाजनको आणि

लालबाग पुलावरील गळती आता कायमचीच थांबली

खराब पर्जन्य जलवाहिन्या मनपाच्या वतीने बदलण्यात आल्या मुंबई: लालबाग उड्डाणपूलावर मागील काही दिवसांपासून

पश्चिम रेल्वेकडून दोन विशेष गाड्या उकई सोनगड स्थानकावर थांबणार

मुंबई  : प्रवाशांच्या सोयीसाठी, पश्चिम रेल्वे चालवण्यात येणाऱ्या उधना-मिरज आषाढी एकादशी विशेष गाडीला उकाई सोनगड