
‘The Emergency Diaries’ chronicles my journey during the Emergency years. It brought back many memories from that time.
I call upon all those who remember those dark days of the Emergency or those whose families suffered during that time to share their experiences on social…
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2025
काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
आज देशात आणीबाणी लागू होऊन ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते आणि इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यानंतर देशात असे वादळ उठले, ज्याचा सामना प्रत्येक भारतीयाला करावा लागला. आणीबाणीचा तो काळा अध्याय अजूनही लोकांच्या मनात एका दुःस्वप्नासारखा जिवंत आहे. इतिहासही तो काळा अध्याय कधीही आपल्या पानांवरून पुसून टाकू शकणार नाही; अशी एक्स पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
When the Emergency was imposed, I was a young RSS Pracharak. The anti-Emergency movement was a learning experience for me. It reaffirmed the vitality of preserving our democratic framework. At the same time, I got to learn so much from people across the political spectrum. I am… https://t.co/nLY4Vb30Pu
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2025
भारतात आणीबाणी लागू झाली तो काळ देशाच्या इतिहासातील काळ्या अध्यायांपैकी एक आहे. भारतीय नागरिक हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळतात. या दिवशी भारतीय संविधानात नमूद केलेल्या मूल्यांना बाजूला ठेवून मूलभूत अधिकार निलंबित करण्यात आले. इतकेच नाही तर प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले. अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना तुरुंगात टाकण्यात आले. सत्ताधीश काँग्रेसने लोकशाहीला ओलीस ठेवले होते.
काय म्हणाले जेपी नड्डा ?
जेव्हा आणीबाणी लागू झाली त्यावेळी मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक तरुण प्रचारक होते. आणीबाणीविरोधी चळवळ त्यांच्यासाठी एक शिकण्याचा अनुभव होता. देशावर लादण्यात आलेल्या आणीबाणीने लोकशाही रचनेचे रक्षण करण्याचे महत्त्व समजले, असे पंतप्रधान मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये नमूद केले आहे.
25 जून 1975 की आधी रात को तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी ने ‘आंतरिक अशांति’ का बहाना बनाकर भारत पर आपातकाल थोप कर देश के संविधान की हत्या कर दी थी।
50 वर्ष बाद भी कांग्रेस उसी मानसिकता के साथ चल रही है, उसकी नीयत आज भी वैसी ही तानाशाही वाली है।
#SamvidhanHatyaDiwas pic.twitter.com/iKZKDcRSFO
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) June 25, 2025
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही एक एक्स पोस्ट केली आहे. यात त्यांनी नमूद केले आहे की, २५ जून १९७५ च्या मध्यरात्री तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 'अंतर्गत अशांततेचे' निमित्त करून भारतावर आणीबाणी लादून देशाच्या संविधानाची हत्या केली. या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली तरी काँग्रेसने आणीबाणी लादणे आणि देशातील नागरिकांवर आणीबाणीच्या काळात अन्याय करणे यासाठी माफी मागितलेली नाही. काँग्रेस आजही त्याच हुकुमशाही मानसिकतेत काम करत आहे.
आणीबाणीवरील पुस्तक
आणीबाणीच्या काळातील पंतप्रधान मोदींचे अनुभव आणि किस्से संकलित करुन ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनने पुस्तक स्वरुपात सादर केले आहेत. या पुस्तकासाठी प्रस्तावना माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी लिहिली आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा हे पण आणीबाणीचे विरोधक होते. यामुळे आणीबाणी विरोधी चळवळीतल्या नेत्याने पुस्तकाला प्रस्तावना दिली म्हणून पंतप्रधान मोदींनी देवेगौडा यांचे विशेष आभार मानले आहेत.