
शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या आध्यात्मिक पालखी यात्रेत लाखो वारकरी देहू आणि आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना, ही यात्रा शुक्रवार सकाळपासून सुरू झाली. फिनोलेक्स केबल्स त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले — त्यांच्या पालखी प्रवासाचा अनुभव सुखकर व्हावा यासाठी प्रत्यक्ष मदत तसेच पिशव्या आणि गांधी टोपीचे वाटप करण्यात आले असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. विशेषतः आमच्या मूळ शहर पुण्यात हा उपक्रम ब्रँडच्या समुदायांना उन्नतीसाठी आणि सेवा देण्यासाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे असेही कंपनीने म्हटले.
अमित माथूर, अध्यक्ष – विक्री आणि विपणन, फिनोलेक्स केबल्स, याविषयी बोलताना म्हणाले आहेत की,'पालखी ही भक्ती, सहनशीलता आणि समुदायभावनेचं सजीव प्रतीक आहे.पुणेस्थित ब्रँड म्हणून,ज्यांनी आमचं अस्तित्व घडवायला मदत केली त्या लोकांप्रती आणि संस्कृतीप्रती आम्ही कृतज्ञ आहोत आणि त्यांच्यासाठी काहीतरी परत देणं ही आमची जबाबदारी मानतो. पालखी दरम्यान आमचे प्रयत्न हे वारकऱ्यांप्रती आमच्या ऐक्याचे एक छोटंसं प्रतीक आहेत.'
फिनोलेक्स केबल्सने नेहमीच व्यवसायिक उत्कृष्टतेसोबत सामाजिक उद्दिष्टांची सांगड घालण्यावर विश्वास ठेवला आहे. सर्वांसाठी अधिक समावेशक आणि जोडलेले भविष्य घडवण्यासाठी तसेच पालखीसारख्या कार्यक्रमांना पाठिंबा देऊन, कंपनी प्रगती आणि परंपरेच्या दरम्यान पूल बांधण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे असा दावा कंपनीने केला आहे.