दिनेश कार्तिकने केली टीम इंडियाची डॉबरमॅनशी तूलना, विधानाने खळबळ

लीड्स: इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा लीड्स कसोटीमध्ये 5 विकेट्सने निराशाजनक पराभव पत्करावा लागला. यामुळे इंग्लंड विरुद्ध  सुरू असलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया ही 0-1 ने पिछाडीवर आहे. मात्र, या पराभवानंतर आणखीन एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ती गोष्ट म्हणजे टीम इंडियाची तुलना ही चक्क डॉबरमॅन कुत्र्याशी करण्यात आली असून, ही तुलना भारताचा माजी क्रिकेटपट्टू दिनेश कार्तिक यानेच केली आहे. त्याच्या या विधानामुळे नवा वाद पेटू शकतो. काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊया...

सध्या भारत इंग्लंड दौऱ्यावर असून, इथे भारत विरुद्ध इंग्लंड असे ५ कसोटी सामने खेळले जात आहेत. यामधील पहिला सामना नुकताच झाला असून, या सामन्यात भारतीय फलंदाजांनी 5 शतके झळकावूनही संघाला विजय खेचून आणता आला नाही.  आता याच कसोटीच्या निकालानंतर टीम इंडिया विषयी दिनेश कार्तिकने केलेले धक्कादायक विधान अमोर आले आहे. त्याने टीम इंडियाची तुलना ही चक्क डॉबरमॅन कुत्र्याशी केली. स्काय स्पोर्ट्सवर याबद्दल बोलताना दिनेश कार्तिक दिसून आला. मात्र त्याने अशी तुलना नेमकी का केली? काय आहे प्रकरण? जाणून घेऊया.

दिनेश कार्तिकने काय म्हटलं?





इंग्लंडच्या ब्रॉडकास्टर चॅनल, स्काय स्पोर्ट्सवर, माजी भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकन क्रिकेट विश्लेषक म्हणून उपस्थित राहिला होता. त्या दरम्यानचा एक व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे.  ज्यामध्ये तो म्हणतो, टीम इंडियाची फलंदाजी डॉबरमॅन कुत्र्यासारखी आहे, ज्याचे डोके चांगले आहे, मधला भाग ठीक आहे, परंतु ज्याला शेपूट नाही. त्याचं हे बोलण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या विधानामुळे चांगलीच खळबळ माजली असून नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

दिनेश कार्तिकने भारतीय फलंदाजीची तुलना डॉबरमॅन कुत्र्याशी का केली?


दिनेश कार्तिक सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय फलंदाजीची तुलना डॉबरमॅन कुत्र्याशी का करतो यामागे देखील एक कारण आहे. दिनेश कार्तिकने व्हिडिओमध्ये जे विधान केले,  त्यात टीम इंडियाचं डोकं (हेडला) चांगलं म्हटलं आहे. भारतीय फलंदाजी क्रमातील हेड म्हणजे टॉप ऑर्डर. जर आपण लीड्समध्ये खेळलेल्या भारताच्या दोन्ही डावांवर नजर टाकली तर टॉप ऑर्डरची कामगिरी चांगली झाल्याचे दिसून आलं. या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये, टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी विकेटवर टिकून रहात शतक झळकावलं, यशस्वी आणि गिलने पहिल्या डावात शतक झळकावले असेल, तर केएल राहुलने दुसऱ्या डावात शतक झळकावले. त्यानंतर त्याने मधला भाग ओके असल्याचे म्हंटले, म्हणजे टीम इंडियाच्या मिडल ऑर्डर फळीचा तो उल्लेख करतो.  तिथे ऋषभ पंतने धावफलकावर खूप धावा केल्या. त्याने दोन्ही डावात शतक झळकावले. त्याच्याशिवाय जडेजा आणि करुण नायर यांनीही काही चांगल्या धावा केल्या. पण ज्याप्रकारे डॉबरमन कुत्र्यांना शेपटी नसते. अगदी त्या प्रकारे टीम इंडियाच्या शेवटच्या फळीने अत्यंत निराशाजनक कामगिरी केल्याच तो स्पष्ट करतो. भारताच्या खालच्या फलंदाजाच्या  खराब कामगिरीमुळे संघाचा  स्कोअरबोर्ड काही धावांनी कमी पडला. लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात ६ विकेटवर ४५३ धावा करणारी टीम इंडिया नंतर फक्त ४७१ धावांवर ऑलआउट झाली. तर दुसऱ्या डावात ६ विकेट्स गमावून ३३५ धावा करणाऱ्या टीम इंडियाचा सर्व खेळ पुढे अवघ्या ३६४ धावांवर आटोपला.
Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे