
सध्या भारत इंग्लंड दौऱ्यावर असून, इथे भारत विरुद्ध इंग्लंड असे ५ कसोटी सामने खेळले जात आहेत. यामधील पहिला सामना नुकताच झाला असून, या सामन्यात भारतीय फलंदाजांनी 5 शतके झळकावूनही संघाला विजय खेचून आणता आला नाही. आता याच कसोटीच्या निकालानंतर टीम इंडिया विषयी दिनेश कार्तिकने केलेले धक्कादायक विधान अमोर आले आहे. त्याने टीम इंडियाची तुलना ही चक्क डॉबरमॅन कुत्र्याशी केली. स्काय स्पोर्ट्सवर याबद्दल बोलताना दिनेश कार्तिक दिसून आला. मात्र त्याने अशी तुलना नेमकी का केली? काय आहे प्रकरण? जाणून घेऊया.
दिनेश कार्तिकने काय म्हटलं?
View this post on Instagram
इंग्लंडच्या ब्रॉडकास्टर चॅनल, स्काय स्पोर्ट्सवर, माजी भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकन क्रिकेट विश्लेषक म्हणून उपस्थित राहिला होता. त्या दरम्यानचा एक व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो म्हणतो, टीम इंडियाची फलंदाजी डॉबरमॅन कुत्र्यासारखी आहे, ज्याचे डोके चांगले आहे, मधला भाग ठीक आहे, परंतु ज्याला शेपूट नाही. त्याचं हे बोलण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या विधानामुळे चांगलीच खळबळ माजली असून नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
दिनेश कार्तिकने भारतीय फलंदाजीची तुलना डॉबरमॅन कुत्र्याशी का केली?
दिनेश कार्तिक सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय फलंदाजीची तुलना डॉबरमॅन कुत्र्याशी का करतो यामागे देखील एक कारण आहे. दिनेश कार्तिकने व्हिडिओमध्ये जे विधान केले, त्यात टीम इंडियाचं डोकं (हेडला) चांगलं म्हटलं आहे. भारतीय फलंदाजी क्रमातील हेड म्हणजे टॉप ऑर्डर. जर आपण लीड्समध्ये खेळलेल्या भारताच्या दोन्ही डावांवर नजर टाकली तर टॉप ऑर्डरची कामगिरी चांगली झाल्याचे दिसून आलं. या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये, टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी विकेटवर टिकून रहात शतक झळकावलं, यशस्वी आणि गिलने पहिल्या डावात शतक झळकावले असेल, तर केएल राहुलने दुसऱ्या डावात शतक झळकावले. त्यानंतर त्याने मधला भाग ओके असल्याचे म्हंटले, म्हणजे टीम इंडियाच्या मिडल ऑर्डर फळीचा तो उल्लेख करतो. तिथे ऋषभ पंतने धावफलकावर खूप धावा केल्या. त्याने दोन्ही डावात शतक झळकावले. त्याच्याशिवाय जडेजा आणि करुण नायर यांनीही काही चांगल्या धावा केल्या. पण ज्याप्रकारे डॉबरमन कुत्र्यांना शेपटी नसते. अगदी त्या प्रकारे टीम इंडियाच्या शेवटच्या फळीने अत्यंत निराशाजनक कामगिरी केल्याच तो स्पष्ट करतो. भारताच्या खालच्या फलंदाजाच्या खराब कामगिरीमुळे संघाचा स्कोअरबोर्ड काही धावांनी कमी पडला. लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात ६ विकेटवर ४५३ धावा करणारी टीम इंडिया नंतर फक्त ४७१ धावांवर ऑलआउट झाली. तर दुसऱ्या डावात ६ विकेट्स गमावून ३३५ धावा करणाऱ्या टीम इंडियाचा सर्व खेळ पुढे अवघ्या ३६४ धावांवर आटोपला.