घड्याळी तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीची मागणी

महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या अध्यक्षांचे पालिका प्रशासनाकडे निवेद


नवी मुंबई  : मानवतावादी दृष्टिकोन ठेवून महापालिका शाळेमध्ये काम करणाऱ्या घड्याळी तासिका तत्वावरील माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीचे आदेश देण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे, शिक्षण विभागाचे अतिरिक्त आयुक्त, शिक्षण विभागाचे उपायुक्त यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.


महापालिका प्रशासनाच्या माध्यमिक शाळांना २०२३ साली शिक्षकांची कमतरता भासल्यानंतर पालिकेचे तत्कालिन आयुक्त यांनी शिक्षकांची जाहिरात देऊन शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी शिक्षकांची नवीन भरती केली. या शिक्षकांना महानगरपालिकेने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी पुनर्नियुक्तीचे आदेश दिले होते.


सदर शिक्षकांनी सलग दोन वर्ष महापालिका शाळेमध्ये सेवा केलेली आहे. या कालावधीत वाढत्या महागाईच्या काळात कमी वेतनामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. शासकीय सुट्टी, साप्ताहिक सुट्टी अशा छोट्या आणि गणपती सुट्टी, दिवाळी सुट्टी व उन्हाळी सुट्टी या सर्व सुट्टयांमध्ये सदर शिक्षकांनी विनावेतन आपल्या कुटुंबाला व गरीब आई-वडिलांना मुंबईसारख्या शहरात सांभाळायचे काम केले आहे. या शिक्षकांना महापालिकेने दिवाळीसाठीचे सानूग्रह अनुदानही दिलेले नाही.


बेरोजगारीचे भयंकर वास्तव सद्य:स्थितीत सर्वत्र आहे. अशा अवस्थेत स्वत:च्या गरीब आई-वडील व कुटुंबांना सांभाळण्यासाठी सदर जाहिरातीने भरलेले गुणवत्ताधारक शिक्षकांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षांसाठी पुनर्नियुक्ती देण्यासाठी महापालिकेने स्वत:हून पुढाकार घेणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाला शिक्षकांची गरज आहे.


या शिक्षकांना महापालिका शाळेत शिकविण्याचा अनुभव आहे. महापालिका शाळा सुरु होवून काही दिवस उलटले आहेत. महापालिका शाळेत आधीच शिक्षकांची कमतरता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येऊ नयेत म्हणून पालिका प्रशासनाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. हे शिक्षक गावावरुन आलेले आहेत. भाड्याच्या घरात वास्तव्य करत आहेत. त्यांना नोकरीची व महापालिकेला शिक्षकांची गरज आहे.


तासिका शिक्षकांवर अन्याय होऊ नये ही आमची मागणी आहे. महापालिकेने मानवतावादी दृष्टीकोन ठेवून घड्याळी तासिका तत्वावरील माध्यमिक शिक्षकांना पुनर्नियुक्तीचे आदेश देण्याची रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे  मागणी केली  आहे.

Comments
Add Comment

Navi Mumbai : नवी मुंबई हादरली! खारघरमध्ये महामार्गालगत महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला; पोलिसांकडून कसून तपास सुरु

नवी मुंबई : नवी मुंबईतील खारघर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ घटना उघडकीस आली आहे. शनिवारी मुंबई-पुणे

IAF's Sukhoi Su-30MKI Lands Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखोई Su-30MKI चे ऐतिहासिक लँडिंग; हवाई दलाची मोठी झेप, व्हिडिओ व्हायरल

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport) विकासातील आणि भारताच्या विमान वाहतूक

Mumbai-Ahmedabad Bullet Train : बुलेट ट्रेनच्या कामाला वेग! २१ किमीच्या भुयारी मार्गासाठी घणसोलीत दुसरं महाकाय 'TBM' कटरहेड सज्ज

नवी मुंबई : भारताचे स्वप्न असलेल्या मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (बुलेट ट्रेन) प्रकल्पाने आता अधिक गती घेतली आहे.

Monsoon Fishing Ban : मत्स्यप्रजननासाठी राज्याच्या सागरी हद्दीत १ जूनपासून यांत्रिक मासेमारीला बंदी; नियम मोडल्यास होणार कडक कारवाई

नवी मुंबई : पावसाळा तोंडावर आला असून, सागरी जीवांच्या प्रजननासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे आणि मत्स्यसंपदेचे

NMMC Declares 504 Buildings Dangerous : नवी मुंबईत ५०४ इमारती 'धोकादायक' घोषित; ५२ अतिधोकादायक इमारती तत्काळ रिकाम्या करण्याचे महापालिकेचे आदेश!

नवी मुंबई : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) संभाव्य दुर्घटना आणि

APMC Market : कलिंगड खाल्ल्याने मृत्यूच्या घटनेचा फटका; वाशी APMC मध्ये कलिंगड विक्री ठप्प! व्यापारी आणि शेतकरी चिंतेत

नवी मुंबई : मुंबईतील पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची