Monday, June 23, 2025

मुंबईत श्रीमंतांची संख्या वाढली

मुंबईत श्रीमंतांची संख्या वाढली

अल्पेश म्हात्रे


गेल्या ११ वर्षांत, स्टार्टअप्स, विज्ञान, क्रीडा, सामुदायिक सेवा, संस्कृती आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये अकल्पनीय कामगिरी करणाऱ्या तरुणांची उल्लेखनीय उदाहरणे आपण पाहिली आहेत. त्याच्याच एक पाऊल पुढे जाऊन गेल्या आठवड्यात क्रीसीलच्या सहकार्याने ३६० वन वेल्थ क्रियेटर लिस्टचा पहिला अंक प्रसिद्ध केला गेला. ही भारतातील आघाडीच्या संपत्ती आणि मालमत्ता व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. या यादीमध्ये किमान ५ अब्ज रुपये किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. या यादीत एकूण २ हजार १३ संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा समावेश आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणून आघाडीवर असून येथे ५७७ संपत्ती निर्माण करणारे राहतात आणि या यादीतील एकूण संपत्तीच्या ४०% वर नियंत्रण ठेवतात त्यामध्ये उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि वारसदार असून त्यांची एकत्रित संपत्ती सुमारे १०० ट्रिलियन रुपये एवढी आहे. देशाच्या जीडीपीच्या एक तृतीयांश इतकं हे प्रमाण आहे. यामधील मध्यम संपत्ती १४.२ अब्ज रुपये म्हणजेच १ हजार ४२३ कोटी रुपये इतकी आहे. यात आकाश अंबानी आणि अनंत अंबानी हे ३.५९ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत भारतीय म्हणून अग्रणी आहेत. १६१ व्यक्तींची संपत्ती प्रत्येकी १०० अब्ज रुपयांपेक्षा जास्त आहे, तर १६९ व्यक्तींची संपत्ती ५० अब्ज रुपये ते १०० अब्ज रुपये दरम्यान आहे. टाटा ग्रुप, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अदानी ग्रुपशी संबंधित कुटुंबीय आणि प्रवर्तक मिळून सुमारे २४% प्रवर्तक संपत्तीचे प्रतिनिधित्व करतात. ही संपत्ती अंदाजे ३६ लाख कोटी रुपये इतकी आहे. ३६० वन वेल्थ क्रियेटर लिस्ट ही भारताच्या आर्थिक भवितव्याला आकार देणाऱ्या व्यक्ती आणि कुटुंबांची नोंद घेणारा एक मैलाचा दगड ठरणारा उपक्रम आहे. नवी दिल्ली आणि बंगळूरुमध्ये अनुक्रमे १७% आणि ८% संपत्ती निर्माते आहेत, तर अहमदाबादमध्ये सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी ५% राहतात. भारतात ४० वर्षांखाली १४३ सक्रिय संपत्ती निर्माण करणारे आहे. त्यापैकी अनेकजण डिजिटल-प्रथम व्यवसाय मॉडेल्समध्ये अग्रणी आहेत. यामध्ये भारत पेचे शाश्वत नक्राणी हे २७ वर्षांचे असून सर्वात तरुण आहे. ही यादी केवळ श्रीमंतांची नसून ती भारताच्या उद्योजकीय आकांक्षा, पिढ्यानपिढ्या चालत आलेली वारसा परंपरा आणि उदयास येणाऱ्या आर्थिक प्रवाहाच प्रतिबिंब आहे. भारतातील अग्रणी ५० व्यावसायिक घराणी ३६० वन वेल्थ क्रियेटर लिस्टमध्ये नोंदवलेल्या एकूण संपत्तीपैकी सुमारे ५९% संपत्तीवर नियंत्रण ठेवतात. केवळ रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अदानी एंटरप्रायझेस या दोन कंपन्यांचं एकत्रित योगदान एकूण संपत्तीपैकी १२ % इतकं आहे.


३६० वन वेल्थ क्रियेटर लिस्टवरील सुमारे ७१% व्यक्ती पुरुष आहे आणि त्यांच्याकडे एकूण संपत्तीपैकी ७६% मालकी आहे. महिलांचं औषधनिर्मिती क्षेत्रात अधिक चांगलं प्रतिनिधित्व असून तिथे त्या फार्मा क्षेत्रातील अब्जाधीशांपैकी ३३% आहे. दुसरीकडे, वित्तीय क्षेत्रातील रुपयातील अब्जाधीशांपैकी २४ % महिला आहे आणि त्या क्षेत्राच्या प्रवर्तक संपत्तीपैकी १३% चे प्रतिनिधित्व करतात. पुरुषांची मध्यम संपत्ती १ हजार ४७५ कोटी रुपये असून, ती महिलांच्या १ हजार २१५ कोटी रुपये मध्यम संपत्तीपेक्षा २२% अधिक आहे. सरासरी संपत्तीच्या बाबतीत, वारसाहक्काने संपत्ती प्राप्त केलेल्या महिला त्यांच्या पुरुष समकक्षांपेक्षा सुमारे २३% अधिक श्रीमंत आहेत. याचे एक कारण असे आहे की, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप व्यवसायांच्या मालकांच्या तुलनेत १०० अब्ज रुपये संपत्ती असलेल्या व्यक्तींनी; विशेषतः मुकेश अंबानी आणि शिव नाडार यांनी त्यांच्या पुरुष आणि महिला वारसांमध्ये अधिक समतोल पद्धतीने संपत्ती हस्तांतरित केली आहे. ३६० ONE Wealth Creators List वरील महिला वारसांपैकी १०% महिला १०० अब्ज रु. संपत्ती गटात मोडतात. भारतातल्या एकूण संपत्ती निर्मितीमध्ये औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअर अॅण्ड सर्व्हिसेस आणि वित्तीय सेवा या तिन्ही क्षेत्रांचा मिळून सुमारे २६ % वाटा आहे. यामध्ये फार्मा क्षेत्राने सर्वाधिक म्हणजे १७४ संपत्ती निर्माते यांसह आघाडी घेतली आहे. त्यानंतर वित्तीय सेवा १५८ आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात १३४ जण आहेत. फार्मा क्षेत्रातील सर्वात श्रीमंत उद्योजक दिलीप शांतिलाल संघवी आहेत, तर फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये नितीन कामत आणि निखिल कामत हे सर्वात श्रीमंत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रात अझीम एच. प्रेमजी हे सर्वोच्च स्थानी आहेत. बँकिंग क्षेत्रात दर व्यक्तीमागे सरासरी संपत्ती ८ हजार ५०० कोटी, दूरसंचार क्षेत्रात ८ हजार ४०० कोटी, विमानवाहतूक क्षेत्रात ७ हजार ९०० कोटी रु. आहे. बँकिंग क्षेत्रात १३ अब्जाधीश रु. असणारे आहेत, दूरसंचारमध्ये २१, विमानवाहतूक क्षेत्रामध्ये ९ जण आहेत. भारताच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींची संपत्ती सूचिबद्ध कंपन्यांमध्ये केंद्रित आहे. ६०७ सार्वजनिकरीत्या सूचिबद्ध कंपन्या १ हजार ७२६ व्यक्तींच्या एकूण वैयक्तिक संपत्तीपैकी ९३% हिस्सा दर्शवतात.
३६० वन वेल्थ क्रियेटर लिस्टवरील वाढत्या संख्येतील व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या व्यवसाय साम्राज्याच्या पलीकडे बघत असून देशातील स्टार्टअप इकोसिस्टममध्ये भर घालत आहेत: यादीतील ५८ जण आणि त्यापैकी ९०% हे पहिल्या पिढीतील उद्योजक असून त्यांनी अशा प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. ते आता युनिकॉर्न किंवा सूनीकॉर्न स्थानापर्यंत पोहोचले आहेत. भारताच्या ३० संपत्ती निर्मात्यांपैकी २८ पहिल्या पिढीतील उद्योजक बायोफार्मा, बायोटेक, फिनटेक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सॉफ्टवेअर-अॅज-अ-सर्व्हिस आणि मानवरहित हवाई यंत्रणा किंवा ड्रोन्स यांसारख्या अत्याधुनिक नवकल्पनांमधून संपत्ती निर्माण करत आहेत. या यादीत एकूण ५४० महिलांचा समावेश आहे.


ईशा अंबानी या महिलांमध्ये सर्वात श्रीमंत व्यावसायिक मालक आहेत. याव्यतिरिक्त, या यादीत ७२ अशा महिला नेतृत्वकर्त्यांची नोंद झाली. या ७२ महिला नेतृत्वकर्त्यांपैकी २९ जणींनी आरोग्यसेवा, औषधनिर्माण, आयटी आणि अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये आपली छाप सोडली आहे, तर २१ जणी पहिल्या पिढीतील उद्योजिका आहेत. या पहिल्या पिढीतील महिला नेतृत्वकर्त्यांनी ई-कॉमर्स सोल्यूशन्स, माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअर अॅण्ड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल सर्व्हिसेस यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, पहिल्या पिढीतील महिला नेतृत्वकर्त्यांच्या एकूण संपत्तीपैकी


७२ % वाटा या क्षेत्रांमधून आलेला आहे. हा अहवाल तयार करण्यात ३६० वन वेल्थ क्रियेटर लिस्ट संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी करण भगत, यतीन शाह, क्रीसील इंटेलिजन्सच्या अध्यक्ष व व्यवसाय प्रमुख प्रीती अरोरा यांचा प्रमुख वाटा आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप इकोसिस्टम आहे, ज्यामध्ये तरुणाई आघाडीवर आहे. भारतातील स्टार्टअप इकोसिस्टम तरुणांमुळे अभूतपूर्व वेगाने भरभराटीला येत आहे. हे केवळ महानगरांपुरते मर्यादित नाही, तर ती आता एक सामाजिक संस्कृती बनली आहे, असे मोदी म्हणाले. हेच खरे आहे.

Comments
Add Comment