Tuesday, June 24, 2025

Mumbai Municiple Election : मुंबई महापालिका निवडणुकीत बदल, प्रभाग रचनेच्या वेळापत्रकात होणार सुधारणा ?

Mumbai Municiple Election : मुंबई महापालिका निवडणुकीत बदल, प्रभाग रचनेच्या वेळापत्रकात होणार सुधारणा ?
मुंबई : राज्यात आगमी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या संदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रभाग रचनेत बदल करुन आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधी होणाऱ्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत, मिळालेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पुणे महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोंबर महिन्यात होणार नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडवणुका आता दिवाळीनंतरच होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली होती. राज्यातील अनेक पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरु केली होती. परंतु मुंबईसह अनेक भागात दिवाळीनंतरच निवडणुका होणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्यामुळे प्रभाग रचनेच्या कालमर्यादेत वाढ करण्याची शक्यता आहे.राज्यसरकारने चार महिन्यात निवडणुका घेण्यासाठी जलद तयारी सुरु केली होती. परंतू प्रभाग रचनेत काही अडचणी निर्माण होत असल्याने ऑक्टोंबरनंतर निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य सरकारनच्या निर्णयानुसार प्रभाग रचनेत बदल करुन अहवाल सादर केला जाईल त्यामुळे निवडणुका दोन ते तीन महिन्यात पुढे ढकलल्या जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येतं आहे.  तयार करण्यात आलेल्या अहवालात प्रारुप देखील प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  प्रभाग रचनेत काही त्रुटी असल्यास त्यावरती हरकती आणि आक्षेप मागवण्यात येतील आणि त्यानंतर अंतिम मुंजूरी देण्यात येणार आहे.निवडणूक आयोगाला निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नगरविकास विभागाचे वेळापत्रक नेमकंं कसं असेल ?

मुंबई महानगरपालिकेचा प्रभाग रचनेचा अहवाल सादरीकरण करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोंबर असणार आहे.

प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे १ ते ५ ऑगस्ट दरम्यान, तर नगरविकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे ६ ते ११ ऑगस्ट दरम्यान सादर केला जाईल.

नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी प्रभाग रचनेचा प्रारुप तयार करण्यासाठी  ३० सप्टेंबर ही मुदत देण्यात आली.

स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासनाकडे असल्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावी तोडगा काढण्यात अडचणी येत आहेत.  त्यामुळे प्राप्त हरकती आणि सूचनांवर २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर ९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान प्राधिकृत अधिकारी शिफारशी विचारात घेऊन प्रभाग रचना अंतिम करून नगरविकास विभागाला पाठवतील, जो प्रस्ताव निवडणूक आयोगाला सादर करेल.


 

 

 

 

 

 

 

 

 


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >