
अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. या अपघातात भारतीयांसह परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये ५० पेक्षा जास्त इंग्लंडचे नागरिक होते. या दुर्दैवी घटनेबाबत शोक व्यक्त करण्यासाठी भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेट संघाने लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी खांद्याला काळी पट्टी बांधली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड लॉरेनेस यांच्या निधनाची माहिती मिळाली म्हणून भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी खांद्याला काळी पट्टी बांधली. यानंतर सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताचे माजी गोलंदाज दिलीप दोशी यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली म्हणून भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी खांद्याला काळी पट्टी बांधली. या पद्धतीने भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी लीड्स कसोटीत पाच दिवसांत तीन वेळा खांद्याला काळी पट्टी बांधली.

लीड्स कसोटीत कोण जिंकणार ? भारत १० विकेट घेणार की इंग्लंड विजयासाठी आवश्यक ३५० धावा करणार ?
लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे सुरू आहे. या सामन्यात चार दिवसांचा खेळ संपला आहे. अखेरच्या ...
लीड्स कसोटी, पाचव्या दिवशी उपहारापर्यंत
भारत
पहिला डाव सर्वबाद ४७१ धावा
दुसरा डाव सर्वबाद ३६४ धावा
इंग्लंड
पहिला डाव सर्वबाद ४६५ धावा
दुसरा डाव बिनबाद ११७ धावा (उपहाराला खेळ थांबला)
इंग्लंडला विजयासाठी हव्या २५४ धावा
भारताला विजयासाठी हव्या दहा विकेट