अमावास्येच्या दिवशी ही कामे करताय सावधान ..!

मुंबई : अमावास्येच्या दिवशी जर तुम्ही काही कामे करत असाल तर सावधान ..! जर तुम्ही अमावास्येला काही काम करताना हे नियम पाळले नाहीत तर तुम्ही अडचणीत सापडाल .अमावास्येला काही कामे टाळावी ती का आणि कोणती चला पाहुया.


अमावास्येच्या दिवशी जर तुम्ही या गोष्टी टाळल्या तर तुमच्यावर सकारात्मक उर्जेचा प्रवाह कायम राहील आणि पितृ देव तुमच्यावर नाराज होणार नाहीत .


अमावास्येला जर तुम्ही मद्यपान करत असाल किंवा मांसाहार करत असाल तर ते करू नये कारण या पदार्थांचे सेवन केल्याने नकारात्मक ऊर्जा शरीरात निर्माण होतात आणि क्लेश होण्याचा धोका वाढू शकतो , त्यामुळे अमावस्येच्या दिवशी मद्य पिऊ नये तसेच मांसाहारही करू नये


अमावास्येच्या दिवशी झाडू खरेदी करू नये कारण त्यामुळे घरात नकारात्मक उर्जा प्रवेश करते .अमावस्येच्या दिवशी केस कापने, नख कापणे अशुभ मानले जाते. अमावास्येच्या दिवशी केस कापू नयेत हा एक पारंपरिक आणि धार्मिक समज आहे. यामागे काही धार्मिक, ज्योतिषशास्त्रीय आणि सामाजिक कारणं सांगितली जातात. अमावास्येच्या दिवशी पितरांची पूजा केली जाते. या दिवशी शरीरशुद्धता आणि संयम पाळावा असा सल्ला दिला जातो. केस कापणे, दाढी करणे हे शरीरावर संस्कार मानले जातात , त्यामुळे अमावस्येच्या दिवशी ही कामे टाळावी


अमावास्येला चंद्र दिसत नाही, आणि हिंदू धर्मात चंद्राला मनाचं प्रतीक मानलं जातं. चंद्राचा अभाव म्हणजे भावना, मनःशांती, स्थैर्य यांचा अभाव असतो . अमावास्या ही सामान्यतः "श्रद्धा" आणि "तपस्या" यासाठी उपयुक्त मानली जाते, पण शुभ कार्यासाठी नव्हे.म्हणून, या दिवशी लग्न, गृहप्रवेश, उत्सव, मंगलकार्य टाळणं उत्तम .महालया अमावास्या, सोमवती अमावास्या, आषाढी अमावास्या यासारख्या अमावास्या काही विशिष्ट पूजेसाठी पवित्र मानल्या जातात. म्हणजेच, सर्व अमावास्या अशुभ नसतात, परंतु सामान्यतः शुभ कार्य टाळावे .

Comments
Add Comment

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०

वांद्रे (पश्चिम) येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती, येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीचे काम घेणार हाती

मुंबई :  एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यास मान्यता

मुंबई : गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त