अमावास्येच्या दिवशी ही कामे करताय सावधान ..!

  53

मुंबई : अमावास्येच्या दिवशी जर तुम्ही काही कामे करत असाल तर सावधान ..! जर तुम्ही अमावास्येला काही काम करताना हे नियम पाळले नाहीत तर तुम्ही अडचणीत सापडाल .अमावास्येला काही कामे टाळावी ती का आणि कोणती चला पाहुया.


अमावास्येच्या दिवशी जर तुम्ही या गोष्टी टाळल्या तर तुमच्यावर सकारात्मक उर्जेचा प्रवाह कायम राहील आणि पितृ देव तुमच्यावर नाराज होणार नाहीत .


अमावास्येला जर तुम्ही मद्यपान करत असाल किंवा मांसाहार करत असाल तर ते करू नये कारण या पदार्थांचे सेवन केल्याने नकारात्मक ऊर्जा शरीरात निर्माण होतात आणि क्लेश होण्याचा धोका वाढू शकतो , त्यामुळे अमावस्येच्या दिवशी मद्य पिऊ नये तसेच मांसाहारही करू नये


अमावास्येच्या दिवशी झाडू खरेदी करू नये कारण त्यामुळे घरात नकारात्मक उर्जा प्रवेश करते .अमावस्येच्या दिवशी केस कापने, नख कापणे अशुभ मानले जाते. अमावास्येच्या दिवशी केस कापू नयेत हा एक पारंपरिक आणि धार्मिक समज आहे. यामागे काही धार्मिक, ज्योतिषशास्त्रीय आणि सामाजिक कारणं सांगितली जातात. अमावास्येच्या दिवशी पितरांची पूजा केली जाते. या दिवशी शरीरशुद्धता आणि संयम पाळावा असा सल्ला दिला जातो. केस कापणे, दाढी करणे हे शरीरावर संस्कार मानले जातात , त्यामुळे अमावस्येच्या दिवशी ही कामे टाळावी


अमावास्येला चंद्र दिसत नाही, आणि हिंदू धर्मात चंद्राला मनाचं प्रतीक मानलं जातं. चंद्राचा अभाव म्हणजे भावना, मनःशांती, स्थैर्य यांचा अभाव असतो . अमावास्या ही सामान्यतः "श्रद्धा" आणि "तपस्या" यासाठी उपयुक्त मानली जाते, पण शुभ कार्यासाठी नव्हे.म्हणून, या दिवशी लग्न, गृहप्रवेश, उत्सव, मंगलकार्य टाळणं उत्तम .महालया अमावास्या, सोमवती अमावास्या, आषाढी अमावास्या यासारख्या अमावास्या काही विशिष्ट पूजेसाठी पवित्र मानल्या जातात. म्हणजेच, सर्व अमावास्या अशुभ नसतात, परंतु सामान्यतः शुभ कार्य टाळावे .

Comments
Add Comment

झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो…

राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर मुंबई : ‘झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो…,’

मुंबईतील उद्योजकाने राम मंदिरासाठी केले १७५ किलो सोने अर्पण

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होऊन दीड वर्ष उलटून गेले, तरी आजही अयोध्येत लाखो भाविक राम मंदिराच्या

धक्कादायक ! रेल्वे अपघातात ७२००० जणांचा गेला जीव, माहिती अधिकारातून आकडेवारी स्पष्ट...

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असणाऱ्या रेल्वेची धक्कादायक माहिती समोर आली. आतापर्यंत रेल्वे अपघातात ७२०००

Railway ticket price : रेल्वेच्या तिकिट दरात वाढ, तत्काळ बुकिंगसाठी नवीन नियम जारी...

मुंबई : देशभरातील कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेने अनेक कालावधीनंतर भाडेवाढ करण्याचा निर्णय

भाईजानच्या आरोग्याचा खुलासा : मेंदूचे गंभीर आजार आणि लढण्याची जिद्द

मुंबई : बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान. त्याच्या फिटनेस आणि अ‍ॅक्शन सीनमुळे तो लाखो तरुणांचा आदर्श आहे. मात्र

मुंबईत मोठ्या भरतीचा इशारा, मुंबईकरांनो जीव सांभाळा

मुंबईचा समुद्र खवळला: ५  दिवस मोठी भरती , १९ वेळा उंच लाटांचा इशारा मुंबई : यंदा मुंबईचा समुद्र जरा जास्तच खवळणार