अमावास्येच्या दिवशी ही कामे करताय सावधान ..!

मुंबई : अमावास्येच्या दिवशी जर तुम्ही काही कामे करत असाल तर सावधान ..! जर तुम्ही अमावास्येला काही काम करताना हे नियम पाळले नाहीत तर तुम्ही अडचणीत सापडाल .अमावास्येला काही कामे टाळावी ती का आणि कोणती चला पाहुया.


अमावास्येच्या दिवशी जर तुम्ही या गोष्टी टाळल्या तर तुमच्यावर सकारात्मक उर्जेचा प्रवाह कायम राहील आणि पितृ देव तुमच्यावर नाराज होणार नाहीत .


अमावास्येला जर तुम्ही मद्यपान करत असाल किंवा मांसाहार करत असाल तर ते करू नये कारण या पदार्थांचे सेवन केल्याने नकारात्मक ऊर्जा शरीरात निर्माण होतात आणि क्लेश होण्याचा धोका वाढू शकतो , त्यामुळे अमावस्येच्या दिवशी मद्य पिऊ नये तसेच मांसाहारही करू नये


अमावास्येच्या दिवशी झाडू खरेदी करू नये कारण त्यामुळे घरात नकारात्मक उर्जा प्रवेश करते .अमावस्येच्या दिवशी केस कापने, नख कापणे अशुभ मानले जाते. अमावास्येच्या दिवशी केस कापू नयेत हा एक पारंपरिक आणि धार्मिक समज आहे. यामागे काही धार्मिक, ज्योतिषशास्त्रीय आणि सामाजिक कारणं सांगितली जातात. अमावास्येच्या दिवशी पितरांची पूजा केली जाते. या दिवशी शरीरशुद्धता आणि संयम पाळावा असा सल्ला दिला जातो. केस कापणे, दाढी करणे हे शरीरावर संस्कार मानले जातात , त्यामुळे अमावस्येच्या दिवशी ही कामे टाळावी


अमावास्येला चंद्र दिसत नाही, आणि हिंदू धर्मात चंद्राला मनाचं प्रतीक मानलं जातं. चंद्राचा अभाव म्हणजे भावना, मनःशांती, स्थैर्य यांचा अभाव असतो . अमावास्या ही सामान्यतः "श्रद्धा" आणि "तपस्या" यासाठी उपयुक्त मानली जाते, पण शुभ कार्यासाठी नव्हे.म्हणून, या दिवशी लग्न, गृहप्रवेश, उत्सव, मंगलकार्य टाळणं उत्तम .महालया अमावास्या, सोमवती अमावास्या, आषाढी अमावास्या यासारख्या अमावास्या काही विशिष्ट पूजेसाठी पवित्र मानल्या जातात. म्हणजेच, सर्व अमावास्या अशुभ नसतात, परंतु सामान्यतः शुभ कार्य टाळावे .

Comments
Add Comment

२६ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवांचा विस्तार; दररोजसाठी वाढणार इतक्या फेऱ्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. २६ जानेवारी २०२६ पासून पश्चिम

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल — उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ संपन्न विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या

मनपा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर २४ तासांच्या आत मंत्रिमंडळाची बैठक, झाले महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. या निकालानुसार

44-Hour Water Block : मुंबईतील धारावीसह पूर्व आणि पश्चिम उपनगर येत्या मंगळवारपासून ४४ तासांचा पाणी ब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.