दुर्दम्य …

  21

डॉ. मिलिंद कुलकर्णी


नितेश राणे म्हणजे अफाट कष्ट, प्रचंड जिद्द आणि विलक्षण नियोजन!! नितेश राणे म्हणजे पुरेपूर आत्मविश्वास, सर्वदूर संपर्क, नेटवर्क आणि अचूक अंदाज असणारी दूरदृष्टी!! नितेश राणे म्हणजे धगधगते हिंदुत्व, आशादायक नेतृत्व आणि उज्ज्वल भविष्य!! इतकी बिरुदे, इतकी विशेषणे लावताना माझ्या डोळ्यांसमोर त्यांचा तब्बल १५ वर्षांचा प्रवास आहे, खूप जवळून पाहिलेला प्रवास!
आजचे नितेश राणे इतक्या सहजासहजी तिथे पोहोचलेले नाहीत याचा मी निकट साक्षीदार आहे. मतदारसंघात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात त्यांनी जो झंझावाती प्रवास केलाय, जे दौरे केलेत त्याला तोड नाही. माझे वडील माझे आदर्श आहेत, पण माझा प्रवास मला करायचा आहे, माझी प्रतिमा मला तयार करायची आहे, जुन्या टीमसह माझी ही नवीन टीम जोडायची आहे याची अगदी सुरुवातीपासून त्यांना जाणीव होती.
राणे साहेब हाच आदर्श!


पण केवळ त्यांच्या पुण्याईवर नव्हे, केवळ राणे पुत्र म्हणून नव्हे, तर नितेश राणे हा एक ब्रँड व्हायला हवा, ही जिद्द बाळगून त्यांनी पावले टाकली.
परदेशात एम.बी.ए. करून आल्यावर अनेक पर्याय असताना राजकारण हा पूर्णपणे नितेश राणे यांचा स्वतःचा निर्णय होता. राणेसाहेब किंवा वहिनी यांनी कधीच या दोन्ही बंधूंना कसलीच सक्ती केली नाही किंवा कसलाच निर्णय लादला नाही. नितेश राणे राजकारणात आले ते २४×७×१२ हा फॉर्म्युला घेऊनच.


२४ तास सातही दिवस, बाराही महिने फक्त नवनवीन योजना आणि त्या कार्यान्वित करणे, नेटवर्क बांधणी हे सारे करताना युवकांची स्वाभिमान संघटना, कोकणात टुरिस्ट गाईड, मुंबईत पाणीप्रश्न आंदोलन, सीसीटीव्ही, फ्री वायफाय, रोजगार मेळावे, यासाठी अफाट कष्ट त्यांनी घेतले. लोक आता त्यांच्याकडे स्वतंत्रपणे वेगळ्या अपेक्षेने पाहू लागले आहेत. २०१४ ची विधानसभा निवडणूक सोपी नव्हती. समोर प्रमोद जठार होते, भाजपाची लाट होती. ती इलेक्शन मी जवळून पाहिली आहे. ‘नो स्टोन लेफ्ट अन् टर्न्ड’ म्हणजे काय ते मी पाहिले. मतदारसंघात अथक दौरे, भाषणबाजीला पूर्ण फाटा, डायरेक्ट संवाद, कार्यकर्त्यांची पद्धतशीर पेरणी, रोज रिपोर्टिंग, प्रचार यंत्रणेवर बारीक नजर, या सगळ्यांतून एक पॅटर्न जन्माला आला. नितेश राणे पॅटर्न ! चिरेबंद, कसलीच फट नसलेला पॅटर्न !


मी बरोबर असायचो, आम्हाला भाषणे द्यायची सवय ! नितेश राणेंनी हा साचेबद्ध प्रकार थांबवला आणि एक जिवंत संवाद, जनता आणि नेता यात प्रस्थापित झाला. डावे / उजवे हा प्रकार त्यांनी रोखला.
आपला नेता हा आपला फोन एका रिंगवर उचलतो हा एक अभूतपूर्व सुखद अनुभव सामान्य कार्यकर्ता घेऊ लागला, मध्यस्त ही गरज संपली, हा फार मोठा फरक होता. सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य माणूस खरोखर सुखावला. मग सुरू झाले गावभर दौरे…. आमदार झाल्यावर त्यांनी प्रचंड संपर्क गावात ठेवला, त्यावेळी खरं तर ते विरोधी पक्षात होते. अनंत अडचणी होत्या. वातावरण अनुकूल नव्हते, निधी आणताना दमछाक व्हायची.


त्यावेळी नितेश राणेंचे जे कौशल्य, जो पेशन्स आणि जी मेहनत घेतली त्याला तोड नाही. कधी सीएसआरचा वापर, कधी स्वखर्चाने, कधी रिलेशनमधून, तर कधी सरकारी निधी अशी तारेवरची कसरत करून विरोधी पक्षात राहूनही दरारा राखला. देवगड नगरपंचायत, वैभववाडी नगरपंचायत, कणकवली नगरपंचायत लागोपाठ नितेश राणे हे मॅच विनर ठरले, गेम चेंजर ठरले,
किंगमेकर ठरले. त्यावेळी परिस्थिती अशी होती की, सगळा जिल्हाच विरोधी पक्षात राहून सांभाळायचा होता. कार्यकर्ते जपायचे होते. त्यांना ताकद, आधार द्यायचा होता.
दोडा मार्गपासून ते खारेपाटणपर्यंत अखंड फिरून त्यांनी तो कालावधी पेलला. मधल्या काळात अनेक अभिनव योजना त्यांनी राबवल्या.


काही योजना रद्द झाल्यावर त्यांच्यावर टीकाही झाली, पण मला जवळून माहिती आहे की, मूळ प्रेरणा आणि उद्देश्य खरोखर जेन्युइन होता. एखादी योजना यशस्वी होणे हे जसे योजकावर अवलंबून असते तितकेच ते कार्यकर्ते आणि समाजावरही अवलंबून असते.


It is not the distance but the direction that matters असे एक प्रसिद्ध वाक्य आहे. नितेश राणे यांची दिशा आणि इंटेंशन स्तुत्य होतेच यात मला कसलाही संशय नाही. नितेश राणे प्रचंड जिद्दी आहेत. जिल्हा बँक इलेक्शनमध्ये त्यांनी दाखवून दिले की, ते जिथे हात घालतात तिथे यश खेचून आणतात. हा एक झपाटलेला माणूस आहे. रात्री ३ वाजता केलेला मेसेज त्यांनी लगेच वाचलेला असतो. निवडणूक काळात तर रात्री अशी कोणतीही वेळ नसते जेव्हा ते फोन करत नाहीत किंवा मेसेज वाचत नाहीत.


मी सलग २ दिवस त्यांच्यासह फिरलो, तर तिसऱ्या दिवशी आजारी पडतो. इतका स्टॅमिना, इतकी पॅशन, इतका जुनून हाच त्यांना फार-फार पुढे नेईल.


सत्तेत नसताना त्यांनी जो आब, जो दरारा, जो विश्वास कमावला तो विलक्षण आहे. माझी त्यांची पाहिली भेट जेव्हा घरी झाली तेव्हा मी त्यांना ‘शोध एका दिशेचा’ हे संदीप वासलेकर लिखित पुस्तक भेट दिले.


हिंदुत्व, संघ यावर जेव्हा मी काही पुस्तके सुचवतो तेव्हा असा अनुभव येतो की, त्यांच्या संग्रही ती असतात. माला खूप मित्र विचारतात की, नितेश राणे यांचे हिंदुत्व हा टेम्पररी स्टँड आहे की रक्तात भिनलेली भूमिका आहे? याचे उत्तर आहे की आता तो त्यांचा श्वास आणि ध्यास आहे. आता या बाबतीत there is no turning back.


आज महाराष्ट्रात कोठेही लँड जिहाद असो की, लव जिहाद असो की, कोणतीही धर्मांध बाब असो, नितेश राणे आज पाहिली मागणी आणि पाहिले नाव आहे.


हे हिंदुत्व संकुचित आहे काय?
याचे उत्तर त्यांच्या मंत्री म्हणून जिल्ह्यात झालेल्या पहिल्या दौऱ्यात मिळाले.प्रचंड व्यस्त दौऱ्यात २ लग्न समारंभ अटेंड करायची होती. एक होता नांदगावच्या रज्जाक भाईकडे आणि दुसरा होता आमच्या रामेश्वरच्या
आरिफ भाईकडे ! आज जाहिद खान भाई, जी लाखो रुपयांची ऑपरेशन्स नितेश राणे, निलेश राणे, साहेब यांच्या एका शब्दावर करतो त्यातील कित्येक ही आमच्या मुस्लीम बांधवाची आहेत. हर्कुलमधील वादळात ज्या मुस्लीम घरांचे नुकसान झाले तेव्हा सर्वप्रथम धावणारे नितेश राणे हेच होते. नांदगावात मुस्लीम युवकाला व्हीलचेअर द्यायला, फ्री ऑपरेशन करून द्यायला नितेश राणेच असतात. इथल्या मुस्लीम बांधवांना माहिती आहे की, वेळेला तेच येणार, पाठीशी तेच राहणार. त्यामुळे हे हिंदुत्व व्यापक आहे, त्याचवेळी देशद्रोही, गद्दार कोणीही असेल त्यांच्या विरोधात आहे. आज महाराष्ट्रात नव्हे, देशात असे एकमेव कुटुंब असेल जिथे एका घरात एक खासदार, एक आमदार आणि एक नामदार आहेत. आज राणे कुटुंब एक कुटुंब नव्हे, तर कोकणी जनतेच्या अस्मितेचे, प्रेमाचे आणि विकासाचे ते प्रतीक आहेत.


नितेश राणे फक्त राजकारणी आहेत का?


मी याचे उत्तर देईन की ते एक अतिशय प्रेमळ वडील आहेत. अतिशय प्रेमळ पुत्र आहेत. मैत्री निभावताना एक दिलदार मित्र आहेत, मोठ्या भावाचा आदर करणारे बंधू आहेत आणि एक माणूस म्हणून, एक नेता म्हणून आदर्श आहेत.


कसलेही व्यसन (राजकारण सोडून) नाही. आहारावर प्रचंड कंट्रोल. कोल्ड ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक आणि कसलेच ड्रिंक नाही. सायंकाळी ८ नंतर जेवत नाहीत. नियमित व्यायाम आहे. मुख्य म्हणजे कॅबिनेट मंत्री होऊनही पाय जमिनीवर, नजर ध्येयावर आणि प्रेम विकासावर आहे. मला त्यांच्या एका क्वाॅलिटीबद्दल फार आदर आहे. कठीण काळ असताना जी माणसे सोबत राहिली, विरोधी पक्षात असताना ज्यांनी लॉयल्टी राखली, ज्यांनी तेव्हा साथ दिली, त्यांना आज ते विसरले नाहीत. सत्ता असताना अनेक येतील, पण वाईट काळात जे बरोबर राहिले, त्यांची फार मनस्वी जाण ते ठेवतात, ते त्यांना विसरले नाहीत, त्यांच्या मनात त्या सगळ्या एकनिष्ठ लोकांसाठी एक वेगळे प्रेम आणि सन्मान आहे. म्हणूनच आज दरवाजात कितीही गर्दी असली तरी हा कार्यकर्ता मागे पडणार नाही, विसरला जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे.


वाढवण बंदर प्रोजेक्ट, सब मरिन टुरिझम, ड्रोन पेट्रोलिंग, अतिक्रमण विरोधात कडक भूमिका या सर्वात त्यांचे खाते पहिल्या पाचमध्ये आहे. जिल्ह्यात उद्योग यावेत, पर्यटन अधिक विकसित व्हावे, रोजगार निर्मिती व्हावी, कौशल्य विकास आणि तोही रोजगाराभिमुख यासाठी ते प्रयत्नशील आहेत. प्रशासनावर त्यांची कमांड आहे. अधिकारी वर्ग अलर्ट मोडवर आहेत. निधी खेचून आणायची ताकद आहे. मंत्रिमंडळात वजन आहे. मंत्री असले तरी जिल्ह्यावर बारीक लक्ष आणि सतत संपर्क आहे. पालक मंत्री म्हणून ठसा उमटला पाहिजे, तुझ्या नावासमोर वाचकाची नजर थबकली पाहिजे असा राणे साहेबांचा आदेश त्यांनी मनावर घेतला आहे आणि काय पाहिजे? या जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सुधारणे, रोजगार निर्माण करणे, गारमेंट इंडस्ट्री, पर्यावरणपूरक उद्योग आणायचे, पर्यटन अधिक विकसित करायचे आणि विकासाचे एक शाश्वत मॉडल उभे करायचे हे स्वप्न घेऊन हा उमदा तरुण जिद्दी नेता काम करतो आहे.
त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

Comments
Add Comment

मी नितेश निलम नारायण राणे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की...

डॉ. सुकृत खांडेकर मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा दि. १५

खात्याची प्रतिष्ठा वाढवणारे मंत्री नितेश राणे

संतोष राऊळ कणकवली मंत्रीपदाच्या काळात खाते कोणतेही असू दे त्या खात्याला प्रतिष्ठा मिळवून द्यायची, त्या खात्यात

जहाल आणि जाज्वल्य

प्रकाश जनार्दन गोगटे देवगड महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे

हिंदुधर्म योद्धा!

प्रियांका साळस्कर : माजी नगराध्यक्षा, देवगड दि.२३ तारीख साहेबांना नेहमीच शुभ ठरली. दि. २३ जून पालकमंत्री तथा

उत्तुंग विचार आणि व्हिजन असलेले नेतृत्व

त्यादिवशी प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर यांचा फोन आला. मला वाटलं आज तो जरा निवांत असावा. म्हणून फोन केला

हिंदू नेता अन् कृतिशील मंत्री

अनघा निकम मगदूम : रत्नागिरी अनेकवेळा काही ऐतिहासिक आणि मोठं घडायचं असेल तर नियती आपला वेळ घेते आणि मगच योग्य