Mumbai Film City Fire : गोरेगाव फिल्मसिटीत भीषण आग, अनुपमा मालिकेचा सेट जळून खाक

मुंबई : मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरातील फिल्म सिटीमध्ये भीषण आग लागली आहे. सकाळी ६.३०च्या सुमारास फिल्म सिटीतील अनुपमा या मालिकेच्या सेटवर ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.





रविवारी अनुपमाच्या सेटवर शूटिंग बंद होते. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अनुपमा मालिकेचा सेट जळून खाक झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग विझल्यानंतर याबाबत अधिक तपास आरे पोलीस करतील.



३ महिन्यांपूर्वी फिल्मसिटीच्या शेजारील घरांमध्ये आग


३ महिन्यांपूर्वी फिल्मसिटीच्या शेजारी नागरमोडी पाड्यात आंबेवाडी परिसरात भीषण आग लागली होती. संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास नागरमोडी पाड्यात असलेल्या आंबेवाडीचा झोपडपट्टीमध्ये ही मोठी आग लागली होती. आगीच्या माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ ते ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. घरात सिलेंडर गॅसचे विस्फोट झाल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात वाढली होती. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाले नाही पण मोठ्या प्रमाणात घरं जळून खाक झाली होती.


Comments
Add Comment

स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थान मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत

Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway : दहिसर-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो-९ ला 'ग्रीन सिग्नल', १० स्थानके, १३ किमी मार्गाचा रुट; फेब्रुवारीत धावणार पहिली ट्रेन

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा एकदा पुढे,कधी आहेत?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुळीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात

मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या