ENG vs IND : टीम इंडियाचे इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे आव्हान

लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर होत आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. भारताने या सामन्यातील दुसऱ्या डावात ३६४ धावा केल्या. यासोबतच भारताने कसोटीत विजयासाठी इंग्लंडसमोर ३७१ धावांचे आव्हान ठेवले आहे.


दुसऱ्या डावात भारताने केएल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांच्या शतकी खेळाच्या जोरावर साडेतीनशे पार धावा केल्या. सलामीवीर केएल राहुलने १३७ धावा तडकावल्या. त्याने २४७ बॉलमध्ये १८ चौकार ठोकत १३७ धावा केल्या. साई सुदर्शनने ३० धावा केल्या. ऋषभ पंतने पहिल्या डावा प्रमाणेच दुसऱ्या डावातही शतक ठोकले. त्याने १४० बॉलमध्ये ११८ धावा ठोकल्या. बाकी इतर कोणत्याही फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. ३४९ धावांवर भारताने तीन गडी गमावले. लोकेश राहुलची विकेट पडल्यानंतर भारताचा डाव सावरूच शकला नाही.


या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर आटोपला. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारावर टीम इंडियाला केवळ ६ धावांची आघाडी मिळाली होती.

Comments
Add Comment

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय