ENG vs IND : टीम इंडियाचे इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे आव्हान

लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर होत आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. भारताने या सामन्यातील दुसऱ्या डावात ३६४ धावा केल्या. यासोबतच भारताने कसोटीत विजयासाठी इंग्लंडसमोर ३७१ धावांचे आव्हान ठेवले आहे.


दुसऱ्या डावात भारताने केएल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांच्या शतकी खेळाच्या जोरावर साडेतीनशे पार धावा केल्या. सलामीवीर केएल राहुलने १३७ धावा तडकावल्या. त्याने २४७ बॉलमध्ये १८ चौकार ठोकत १३७ धावा केल्या. साई सुदर्शनने ३० धावा केल्या. ऋषभ पंतने पहिल्या डावा प्रमाणेच दुसऱ्या डावातही शतक ठोकले. त्याने १४० बॉलमध्ये ११८ धावा ठोकल्या. बाकी इतर कोणत्याही फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. ३४९ धावांवर भारताने तीन गडी गमावले. लोकेश राहुलची विकेट पडल्यानंतर भारताचा डाव सावरूच शकला नाही.


या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर आटोपला. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारावर टीम इंडियाला केवळ ६ धावांची आघाडी मिळाली होती.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत