केदारनाथहून परतल्यानंतर अभिनेत्री अमृता खानविलकरची तब्येत बिघडली

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील चंद्रमुखी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अमृता खानविलकर नुकतीच केदारनाथ यात्रेला गेली होती. याचे फोटो शेअर करत तिने आपला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला होता. मात्र, आता केदारनाथहून परतल्यानंतर अमृताची तब्येत बिघडली आहे. सोशल मीडियावर याबाबत व्हिडीओ पोस्ट करत तिने चाहत्यांना माहिती दिली आहे.


अमृता खानविलकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ पोस्ट शेअर करत चाहत्यांना खास सल्ला दिला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या हाताला सलाइनसह तेथे लावलेली पट्टी दिसत आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणते, "हॅलो, नमस्कार. तर मी काल केदारनाथहून परत आले आहे आणि आज मला हे झालं आहे. गेले दोन ते तीन दिवसांपासून मला बरं वाटत नाही आहे, त्रास होत आहे. पण डोलो गोळी खाऊन मी काम चालवत होते. केदारनाथला जाऊ इच्छिणाऱ्यांना मी हे सांगते की, समुद्राच्या उंचीपासून ११ हजार फुटावर हे देवस्थान आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराला समजण्याची गरज आहे. तुम्ही तिथे जाणार असाल तर तिथल्या वातावरणाची आधी तुमच्या शरीराला सवय करुन घ्या. कारण माझ्या शरीराला तिथलं वातावरण पटकन सहन झालं नाही".


त्यानंतर पुढे ती म्हणाली, "जेव्हा मी खाली उतरत होते तेव्हा हालत खराब झाली. शेवटच्या चार किलोमीटरवर तर माझ्या पायाचे लचकेच पडले होते. अंगदुखी वगैरे आता कमी झालं आहे. पण मला माऊंटेन सिकनेस म्हणतात ना बहुतेक ते मला झालं आहे. तुम्हीही तिथे जाण्याचा प्लॅन करत असाल तर सगळी औषधं घेऊन जा, ORS घेऊन जा. घाईगडबडीमध्ये ही ट्रीप करायला जाऊ नका. तिथे पोचल्यानंतर शांतपणे एक दिवस घालवा. तिथे फिरा, कॉफी प्या. जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. दुसऱ्या दिवशी मग दर्शन घ्या"


दर्शनानंतर तिथे थांबा आणि नंतरच खाली उतरा. आम्ही नशिबवान आहोत की, आम्हाला पाऊस लागला नाही, कुठलीच दगदग झाली नाही. पण, तिथलं वातावरण वेगळंच आहे. समुद्रापासून इतक्या उंचीवर जाणं आणि तिथे गेल्यानंतर आपल्यासाठी ते अशक्य असतं. म्हणजे मी तिथे जाण्यापूर्वी एक आठवडा तरी ५ ते ६ किलोमीटर चढ चढत होते. पण तिकडे जाऊन वातावरण कधी बदलेल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. तिकडचं वातावरण फारच वेगळं आहे. असं म्हणत अभिनेत्रीचा तिचा अनुभव शेअर केला.

Comments
Add Comment

Aamir Khan : आमिर खानला बिश्नोई गँगच्या नावाने धमकी? सोशल मीडियावरील पोस्टमुळे खळबळ; ‘लव्ह जिहाद’चा केला उल्लेख

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या (Lawrence Bishnoi Gang) नावाने सोशल मीडियावर (Social Media) धमकी

Upcoming Hollywood Movies Releases : २०२६ मध्ये चित्रपटसृष्टीत महाधमाका! ‘स्पायडर-मॅन’पासून ‘अ‍ॅव्हेंजर्स डूम्सडे’पर्यंत मोठ्या सिनेमांची मेजवानी

हॉलीवूड (Hollywood) सिनेमांसाठी २०२६ हे वर्ष खास ठरणार आहे. क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘द ओडिसी’ (The Odyssey) या बिग बजेट

Aamir Khan On Sonam Wangchuk : 'रँचो' आणि सोनम वांगचुक यांचा संबंध नाही! आमिर खाननं '3 इडियट्स'च्या गैरसमजावर दिलं स्पष्टीकरण

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं (Aamir Khan) ‘3 इडियट्स’ (3 Idiots) चित्रपटातील ‘रँचो’ (Rancho) हे पात्र प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Itha Movie : 'इठा' चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई यांच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप

पुणे : तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर ( Itha Movie) यांनी आपल्या अद्वितीय कलेच्या जोरावर महाराष्ट्राच्या