केदारनाथहून परतल्यानंतर अभिनेत्री अमृता खानविलकरची तब्येत बिघडली

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील चंद्रमुखी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अमृता खानविलकर नुकतीच केदारनाथ यात्रेला गेली होती. याचे फोटो शेअर करत तिने आपला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला होता. मात्र, आता केदारनाथहून परतल्यानंतर अमृताची तब्येत बिघडली आहे. सोशल मीडियावर याबाबत व्हिडीओ पोस्ट करत तिने चाहत्यांना माहिती दिली आहे.


अमृता खानविलकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ पोस्ट शेअर करत चाहत्यांना खास सल्ला दिला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या हाताला सलाइनसह तेथे लावलेली पट्टी दिसत आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणते, "हॅलो, नमस्कार. तर मी काल केदारनाथहून परत आले आहे आणि आज मला हे झालं आहे. गेले दोन ते तीन दिवसांपासून मला बरं वाटत नाही आहे, त्रास होत आहे. पण डोलो गोळी खाऊन मी काम चालवत होते. केदारनाथला जाऊ इच्छिणाऱ्यांना मी हे सांगते की, समुद्राच्या उंचीपासून ११ हजार फुटावर हे देवस्थान आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराला समजण्याची गरज आहे. तुम्ही तिथे जाणार असाल तर तिथल्या वातावरणाची आधी तुमच्या शरीराला सवय करुन घ्या. कारण माझ्या शरीराला तिथलं वातावरण पटकन सहन झालं नाही".


त्यानंतर पुढे ती म्हणाली, "जेव्हा मी खाली उतरत होते तेव्हा हालत खराब झाली. शेवटच्या चार किलोमीटरवर तर माझ्या पायाचे लचकेच पडले होते. अंगदुखी वगैरे आता कमी झालं आहे. पण मला माऊंटेन सिकनेस म्हणतात ना बहुतेक ते मला झालं आहे. तुम्हीही तिथे जाण्याचा प्लॅन करत असाल तर सगळी औषधं घेऊन जा, ORS घेऊन जा. घाईगडबडीमध्ये ही ट्रीप करायला जाऊ नका. तिथे पोचल्यानंतर शांतपणे एक दिवस घालवा. तिथे फिरा, कॉफी प्या. जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. दुसऱ्या दिवशी मग दर्शन घ्या"


दर्शनानंतर तिथे थांबा आणि नंतरच खाली उतरा. आम्ही नशिबवान आहोत की, आम्हाला पाऊस लागला नाही, कुठलीच दगदग झाली नाही. पण, तिथलं वातावरण वेगळंच आहे. समुद्रापासून इतक्या उंचीवर जाणं आणि तिथे गेल्यानंतर आपल्यासाठी ते अशक्य असतं. म्हणजे मी तिथे जाण्यापूर्वी एक आठवडा तरी ५ ते ६ किलोमीटर चढ चढत होते. पण तिकडे जाऊन वातावरण कधी बदलेल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. तिकडचं वातावरण फारच वेगळं आहे. असं म्हणत अभिनेत्रीचा तिचा अनुभव शेअर केला.

Comments
Add Comment

PATRAPATRI : ‘पत्रापत्री’ शब्दांची जादू आणि मैत्रीच्या आठवणींचा शंभर प्रयोगांचा यशस्वी प्रवास!

Vijay Kenkre and Dilip Prabhavalkar : सांस्कृतिक विश्वात गेल्या दोन वर्षांत ज्या एका प्रयोगाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, तो

CINTAA : रणवीर सिंग-फरहान अख्तर वादावर CINTAA अध्यक्ष पूनम ढिल्लों यांची स्पष्टोक्ती; 'कलाकारांना कामगार म्हणून अधिकृत मान्यता मिळवणे हेच आमचे ध्येय'

NAVI MUMBAI : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील अलीकडील वादाच्या पार्श्वभूमीवर CINTAA च्या अध्यक्षा

Bharat Bhagy Vidhata Movie:  ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटावर नर्सेस संघटनेचा आक्षेप; प्रदर्शनापूर्वीच निर्माण झाला वाद

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) आगामी ‘भारत भाग्य विधाता’ (Bharat Bhagy Vidhata) हा चित्रपट सध्या चर्चेत असून

'Deool Band 2' Box Office Collection : मराठी सिनेमाचा नवा विक्रम? 'देऊळ बंद २'ची १०० कोटींच्या दिशेने दमदार वाटचाल!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित आणि अभिनित 'देऊळ बंद २' (Deool Band 2) चित्रपटाची जोरदार

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

रंगात आलेला प्रयोग राजवाडेंनी थांबवला; कारण...

नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजत आहे.